शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

मोदी सरकारचेच आंदोलनाला फंडिंग; पंजाबच्या शेतकऱ्यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 18:17 IST

PM kisan sanman scheme: देशभरातील शेतकऱ्यांना पैसे पाठवून मोदी सरकारने भेदभाव केलेला नाही. या योजनेतील आजचे पैसे हे पंजाबच्या शेतकऱ्यांनाही मिळाले आहेत. कृषी कायद्यांविरोधात याच राज्यातील बहुतांश शेतकरी आंदोलनात उतरले आहेत.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात एकीकडे मोठ्या संख्येने शेतकरी दिल्ली सीमेवर गेल्या महिनाभरापासून उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये टाकले आहेत. हे पैसे पंजाब, हरियाणाच्या आंदोलक शेतकऱ्यांनाही मिळालेले आहेत. यामुळे मोदी सरकारच शेतकरी आंदोलनाला फंडिंग करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

बँक खात्यात पैसे आल्यानंतर पंजाबच्याच शेतकऱ्यांनी हा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आंदोलन करण्यासाठी हा पैसा पाठविला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पैसा कोण पुरवते, असा सवाल भाजपाच्याच नेत्यांनी उपस्थित केला होता. यावर या शेतकऱ्यांनी केलेले हे आरोप या प्रश्नाचे उत्तर असल्याचे म्हटले जात आहे. 

देशभरातील शेतकऱ्यांना पैसे पाठवून मोदी सरकारने भेदभाव केलेला नाही. या योजनेतील आजचे पैसे हे पंजाबच्या शेतकऱ्यांनाही मिळाले आहेत. कृषी कायद्यांविरोधात याच राज्यातील बहुतांश शेतकरी आंदोलनात उतरले आहेत. यामुळे या पीएम किसान योजनेच्या हप्त्यावरून पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलेले हो वक्तव्य धक्कादायक आहे. आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पंतप्रधानांनी हा पैसा आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठविला आहे. पंजाबच्या सियालका गावात राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये आले आहेत. या गावातील शेतकरी बलविंदर सिंह यांचे म्हणणे आहे की, सरकार आमच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मात्र, तेच फंडिंग करत आहेत. जे पैसे मोदी यांनी आम्हाला पाठविले आहेत ते आम्ही आंदोलनासाठी दान करणार आहोत. 

अन्य एका शेतकरी जसपाल सिंह यांनी सांगितले की,  जे लोक आंदोलनासाठी फंडिंग कोण करते यावर प्रश्न विचारत आहेत, त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की पंजाबचे शेतकरी घराघरात जाऊन आंदोलनासाठी समर्थन मागत आहेत. लोक त्यांच्या इच्छाशक्तीनुसार 50 ते 5000 रुपये दान करत आहेत. या पैशांतून आवश्यक साहित्य खरेदी करून ते दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांना पाठविले जात आहे. आमची लढाई सरकारविरोधात आहे, या पैशांचा वापर आम्ही आमच्यासाठी करणार नाही. हे पैसे आम्ही आंदोलनासाठी देणार.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी