शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

राज ठाकरे इन ऍक्शन मोड; कल्याणची जबाबदारी तीन खास शिलेदारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 07:29 IST

गळतीनंतर कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकांतात वैयक्तिक चर्चा केली

कल्याण :  राजेश कदम आणि मंदार हळबे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी या गळतीचा चांगलाच धसका घेतला आहे. गळतीनंतर कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकांतात वैयक्तिक चर्चा केली आहे. तसेच पक्षाला एकामागोमाग बसणारे धक्के, तसेच गळती रोखण्यासाठी नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या नेत्यांकडे केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘प्रभारी’ म्हणून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.मनसेलाही याआधी २०१४ ची लाेकसभा आणि २०१५ च्या केडीएमसी निवडणुकांतही असे धक्के बसले हाेते. आता मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी मनसेला रामराम केला आहे. त्यांच्यावर साेशल मीडियावरून टीकेची झाेड उठली आहे. त्यांच्या पक्षबदलाबाबत राजकीय तज्ज्ञ तर्कवितर्क लढवत आहेत. तसेच मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह लावले जात आहे. निवडणुकीत फटकापक्ष स्थापनेनंतर २०१० मध्ये केडीएमसीच्या निवडणुकीत तब्बल २८ नगरसेवक निवडून आलेल्या मनसेचे २०१५ निवडणुकीत मात्र नऊ नगरसेवक निवडून आले हाेते. पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसलेले हे धक्के लक्षात घेता ‘डॅमेज कंट्रोल’-साठी प्रयत्न केले जात आहेत. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे