शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दक्षिण मुंबईत कमी झाला मनसेचा प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 01:49 IST

आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या मनसेने यंदाची लोकसभा न लढविता काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले

- शेफाली परब-पंडित मुंबई : आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या मनसेने यंदाची लोकसभा न लढविता काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र दक्षिण मुंबईत गेल्या लोकसभा निवडणुकीत तिसºया क्रमांकावर असलेले मनसेचे इंजीन पुढच्या निवडणुकांमध्ये धडाडले नाही. पालिका निवडणुकीत निवडून आलेले सहा नगरसेवकही शिवसेनेत गेल्यामुळे मनसे तेथेही नामशेष झाले.त्यामुळे मनसेचा प्रभाव कमी होताना दिसून आला आहे. गिरगाव, ताडदेव, भायखळा, शिवडी या भागांमध्ये असलेली मनसेची काही मतेच तेवढी काँग्रेसच्या पारड्यात पडतील. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत मनसेने दुसरा क्रमांक मिळवत शिवसेनेचा पत्ता साफ केला. पण हाच प्रभाव मनसेला पुढच्या पाच वर्षांत राखता आला नाही.मधल्या काळात मनसेतील मतभेद, दुफळी उजेडात आल्यामुळे मतदारांमध्ये या पक्षाकडून असलेल्या अपेक्षा कमी होत गेल्या. परिणामी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे तिसºया क्रमांकावर फेकली गेली. तरीही या पक्षाने ८४ हजार मते मिळविली होती. काँग्रेसला संधी देण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाबाबत पक्षांतर्गतच संभ्रम आहे. त्यामुळे या वेळेस तरी मनसेची मते निर्णायक ठरण्याची चिन्हे नाहीत.

>मनसेने लढविलेल्या इतर निवडणुकांचे काय झाले?दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेचा प्रभाव दक्षिण मुंबईमध्ये कमीच होताना दिसून आला. २००९ मध्ये एक लाख ६० हजार मते मिळवणाºया मनसेने २०१४ मध्ये ८४ हजार मते मिळविली. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबादेवी, वरळी, कुलाबा, मलबार हिल मतदारसंघात मनसेला सरासरी दोन ते सहा टक्केच मते पडली. भायखळ्यात १६ टक्के तर शिवडीत २० टक्के मते मिळाली होती.मुंबई महापालिकेतच मनसेचा झेंडा फडकत होता. २०१७ च्या निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले. मात्र सहा नगरसेवक शिवसेनेने फोडले. त्यामुळे आता एकच मनसे नगरसेवक आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-south-pcमुंबई दक्षिण