शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

"आरेमधील मेट्रो कारशेड आता कांजूरमार्गला; योग्यवेळी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 2:24 AM

CM Uddhav Thackeray News: समृद्धी यावी, कोरोना नको!

मुंबई : आरे येथील मेट्रो कारशेड आता कांजूरमार्ग येथील जमिनीवर उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. कांजूरमार्ग येथील जागेसाठी कोणताही खर्च आलेला नाही. शून्य रुपयात सरकारची ही जागा मेट्रोसाठी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

रविवारी सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना, आरे जंगल, मेट्रो कारशेड, अनलॉक प्रक्रिया अशा विविध मुद्यांवर भाष्य केले. आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्यात येणार आहे. तर, आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत ही इतर कारणांसाठी वापरता येईल, त्यामुळे त्यासाठी खर्च झालेला निधीही वाया जाणार नाही. यामध्ये मेट्रो-३ आणि ६ नंबरच्या लाइनचे एकत्रीकरण करण्यात आल्याने जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, आरेतील झाडे वाचविण्यासाठी आंदोलन केलेल्या पर्यावरणवाद्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरेमधील ६०० हेक्टर जागा यापूर्वीच जंगल म्हणून राखीव करण्याचा निर्णय झाला आहे. त्यात आणखी २०० हेक्टरची भर घालत मुंबई शहरातच ८०० हेक्टरचे जंगल राखले जाणार आहे. मात्र, हा निर्णय घेताना आरेतील आदिवासीपाडे, आदिवासीगोठे यांच्या अस्तित्वाला धक्का लागणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी आरे येथील मेट्रो कारशेडवरून भाजप व शिवसेनेत घमासान सुरू झाले होते. सत्तांतरानंतर शिवसेनेने आरे मेट्रोशेडला स्थगिती दिली. हे कारशेड आरे पहाडी गोरेगाव येथे उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधिमंडळात दिली होती. यावर, राज्य सरकारची भूमिका व्यवहार्य नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.मला खोटी झाडे लावता येत नाहीतआधी पर्यावरणाचे जतन आणि राहिलेल्या ठिकाणी विकास, ही भूमिका असल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजप सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेवर निशाणा साधला. आहे ते कापायचे आणि नुसत्या थापा मारायच्या, ५०० कोटी झाडे लावली म्हणायचे. कुठे लावली एवढी झाडे, असा सवाल करतानाच मला खोटी झाडे लावता येत नाहीत, आहे ती झाडे वाचवा, जपा, ही आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.मंदिर प्रश्नावरून विरोधकांना सुनावलेमंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. लोकांची जबाबदारी तुमच्यावर नाही, तर आमच्यावर आहे. आम्हाला लोकांची काळजी आहे. उगाच तंगडीत तंगडी अडकवू नका. मंदिरांबाबत आम्ही हळुवारपणे निर्णय घेत आहोत. उघडलेल्या मंदिरांतून सुबत्ता, समृद्धी यायला हवी. कोरोनाचा विषाणू नाही, असे सांगत योग्यवेळी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाहीकेंद्र सरकारने जो कृषी कायदा आणला आहे, त्याबाबत सर्व संबंधितांशी, शेतकरी संघटनांशी संवाद साधत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कृषी कायद्याचे फायदे आणि तोटे विचारात घेऊन राज्यातील शेतकºयांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून शेतकºयांना नुकसानभरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.मास्क हवे की लॉकडाऊन, याचा विचार कराकोरोना अजून गेलेला नाही. काही देशांत तर याची दुसरी लाट आली आहे, त्यामुळे आपल्याला सावधपणे पुढे जावे लागत आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत आहेत. सुरू केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही. मास्क हवा की लॉकडाऊन; सुरक्षित अंतर राखणे, स्वच्छता की लॉकडाऊन, याचा विचार करा. लॉकडाऊन करण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, सांभाळा, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.निर्णय केवळ अहंकारातून - फडणवीसमुंबई : आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा राज्य सरकारचा निर्णय केवळ अहंकारातून घेण्यात आल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास चार हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMetroमेट्रोAarey ColoneyआरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस