शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांसोबतच्या 'त्या' भेटीत काय घडलं?; पहाटेची आठवण काढत शिवसेनेच्या मंत्र्यानं सर्वच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 13:59 IST

निलेश राणेंच्या आरोपांना शिवसेनेच्या मंत्र्याकडून प्रत्युत्तर; सांगितला सहा दिवसांपूर्वीचा घटनाक्रम

रत्नागिरी: शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची रत्नागिरीतील विश्रामगृहात भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. २०० लोकांसोबतची बैठक गुप्त कशी काय असू शकते?, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे, असं सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. ज्यांना जिल्ह्याचं राजकारण जमत नाही, त्यांच्याबद्दल मी काय बोलावं, अशा शब्दांत सामंत यांनी माजी खासदार निलेश राणेंना टोला लगावला.लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रो अन् लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणीदेवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले. रत्नागिरी गेस्टहाऊसवरउदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूमपर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले, असं ट्विट निलेश राणेंनी आज सकाळी केलं. त्यावर विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणं, त्यांचा आदर करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र ज्यांना ही संस्कृतीच समजत नाही, अशा लोकांना देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यासारखे नेते सोबत घेणार असतील, तर भविष्यातलं राजकारण काय असेल याची त्यांनी कल्पना करावी, असं सामंत म्हणाले.पंतप्रधान मोदी खास माणसाला मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत; गुजरात कनेक्शन येणार कामी? मी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात होतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिथे आले. त्यांचं जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी मी तिथे पोहोचलो. त्यावेळी तिथे शिवसेना, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. ही भेट गुप्त नव्हती. ती दिवसाढवळ्या झाली. ही घटना काही पहाटेच्या शपथविधीसारखी नव्हती. अंधारात झाली आणि मग इतरांना कळली, असं याबाबतीत झालं नाही, असा खोचक टोला सामंत यांनी लगावला. माझ्यावर असे आरोप केले म्हणून माझं करिअर थांबेल असं काहींना वाटत असेल. तर तसं काहीही होणार नाही. उद्घव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले.देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते मला वरिष्ठ आहेत. त्यामुळेच मी त्यांच्या स्वागताला पोहोचलो. यात राजकारण नाही. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आरोप आणि दावे कोण करतो त्यावर अवलंबून असतं. ज्यांना जिल्ह्याचं राजकारण जमत नाही, दोन जिल्हे सांभाळता येत नाहीत, त्यांच्यावर मी कशाला बोलावं, असा सवाल विचारत सामंत यांनी राणेंना टोला लगावला. आमची भेट गुप्त नव्हती. फडणवीस माझ्या मतदारसंघात आले. म्हणून मी त्यांची औपचारिक भेट घेतली, असं सामंत यांनी सांगितलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUday Samantउदय सामंतNilesh Raneनिलेश राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे