शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

व्हिडीओ क्लीप, कागदपत्रे उघड केली तर अनेकांना हादरा बसेल; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 13:58 IST

विनोद तावडे, पंकजा मुंडे, यासारख्या अनेक नेत्यांवर अनेक आरोप झाले. पण कोणाचेही राजीनामे घेतले नाहीत, माझ्यावर आरोप झाला आणि राजीनामाही घेतला हे मनाला वेदनादारक होतं, मला राजीनामा देण्याबाबत सांगितलं होतं असं एकनाथ खडसे म्हणाले.

ठळक मुद्देमाझ्याकडे अनेक व्हिडीओ, कागदपत्रे आहेत ती समोर आली तर धक्का बसेलवरिष्ठांकडून न्याय मिळाला नाही तर जनतेसमोर मांडेनमाझ्यावर जे आरोप केले ते विरोधकांनीही केले नाहीत, माझा राजीनामा विरोधकांनाही मागितला नाही

मुंबई – १९९५ पासून आमच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जात होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता एकच निवडणूक लढवली आहे. त्यामुळे कोणती यादी पाठवली जाते, कोणती डावलली जाते हे आम्हाला पक्क माहिती आहे अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसेंनीभाजपाच्या राज्य नेतृत्वावर टीकास्त्र सोडलं. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचं कामकाज सुरु असताना मला अँन्टी चेंबरमध्ये बोलावलं, तिथे मी गेलो, आम्ही दोघचं होतं, त्यावेळी राज्यपालपदासाठी मी तुमचं नाव पाठवतोय असं चेंबरमध्ये बोलणं झालं. माझ्या एकलुत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो असंही फडणवीस म्हणाले, त्यांनी प्रयत्न केले असतील पण झालं नाही. राज्यसभेच्या वेळीही माझं नाव सुचवणार असं सांगितले पण त्यानंतरही नाव वरिष्ठांना नाकारलं असं सांगितले. विधान परिषदेसाठीही नाव पाठवलं, जी नावे दिली ती वगळून दुसरी ४ नावं आली. त्यावेळी मी म्हटलं जमत असेल तर करा, उगाच खोट्या अपेक्षा दाखवू नका, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पाठवलेल्या यादीला संमती देत नाही म्हणजे कुठेतरी गडबड वाटते, कारण आमच्यावेळी वेगळं होतं, जी नावे आम्ही दिल्लीला पाठवत होतो त्यांना संमती मिळत होती असं ते म्हणाले.

त्याचसोबत माझ्याकडे अनेक व्हिडीओ, कागदपत्रे आहेत ती समोर आली तर धक्का बसेल, मी इतक्या खालची पातळीचं राजकारण करत नाही, वरिष्ठांना ते दाखवलं आहे. त्यांच्यासारखं मी चुका केल्या नाहीत, या व्यक्तिगत बाबी आहेत, मी पक्षाच्या वरिष्ठांसमोर हे मांडले आहे. वरिष्ठांकडून न्याय मिळाला नाही तर जनतेसमोर मांडेन.काहींच्या जीवनात बदल घडू शकतो. ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचं कारण नाही. जे काही होईल जनतेसमोर येईल असा इशाराही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

दरम्यान, ४० वर्षाच्या राजकीय जीवनात एकही आक्षेप माझ्यावर आला नाही, माझ्यावर जे आरोप केले ते विरोधकांनीही केले नाहीत, माझा राजीनामा विरोधकांनाही मागितला नाही. पक्षातंर्गत ज्या गोष्टी झाल्या त्यानंतर नैतिक पदावरुन राजीनामा दिला. नंतर सरकारच्या काळात खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एक्सिस बँकेबाबत आरोप झाला. पदाचा दुरुपयोग झाला असं म्हटलं मग मला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा त्या वेदना आणि खंत माझ्या मनात नेहमी राहणार आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, यासारख्या अनेक नेत्यांवर अनेक आरोप झाले. पण कोणाचेही राजीनामे घेतले नाहीत, माझ्यावर आरोप झाला आणि राजीनामाही घेतला हे मनाला वेदनादायी होतं, मला राजीनामा देण्याबाबत सांगितलं होतं असं एकनाथ खडसे म्हणाले.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

पेशवेकालीन इतिहास पाहिला तर त्यात बारभाई मंडळ होतं त्यांनी जे कारस्थान जे होतं त्यावरुन ते प्रसिद्ध झालं. धा चा मा केल्याने काही गडबड झाली ती पाहिलेली आहे. नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान म्हणून पुस्तकाचं नाव आहे. सध्या पुरावे, कागदपत्रे गोळा करत आहे. २००९ ते २०१४ आणि २०१४ ते मी राजीनामा देईपर्यंत जे काही घडलं, ते पुराव्यानिशी मांडणार आहे. लिहायला उशीर झाला तरी चालेल पण जे मांडेन ते वस्तूनिष्ठ असेल. लवकरच त्याचा लेखक ठरवेन

कोणी मुख्यमंत्री होवो अन्यथा पंतप्रधान होवो, भाजपात संधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे. देवेंद्र फडणवीस वरिष्ठांच्या जवळ आहे. महाराष्ट्रात सरकार आलं असतं पण मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे ही भूमिका घेतल्याने १०५ जागा मिळूनही टाळ वाजवत बसावं लागलं नसतं. दोन्ही पक्ष मिळून संख्याबळ होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी काय बिघडलं असतं. युती म्हणून निवडणूक लढवली तडजोड थोडी केली असती तर ही वेळ आली नसती. मी पुन्हा येईन हे फक्त देवेंद्र फडणवीस म्हणत होते, बाकी कोण म्हणत नव्हते. भाजपाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, सभागृहात विरोधी पक्षनेते बोलतात पण बाहेर बोलणारे राहिले कुठे? सामुहिकपणे हल्लाबोल करुन राज्य सरकारला धारेवर धरता येते असंही एकनाथ खडसे म्हणाले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा