शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: “मुंबईत अनेक अनधिकृत बांधकाम; काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, अन्यथा..."

By प्रविण मरगळे | Updated: November 14, 2020 13:08 IST

Sanjay Raut Interview with Kunal Kamra News: मुंबई महापालिकेने ती कारवाई केल्यावर आम्ही तशा आशयाची हेडलाईन देऊन बातमी केली असा टोला राऊतांनी लगावला.

ठळक मुद्देअनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जेसीबी खूप महत्वाचं असतं, मुंबईत अनेक अनाधिकृत बांधकामे आहेतअभिनेत्रीच्या अनाधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली, ती आम्ही केली नाहीकोणालाही काही उखडायचं असेल तर उखडावं, त्यामुळे महिलेचा सन्मान करणं आमचं काम आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या अनाधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने जेसीबी फिरवला होता, या कारवाईविरोधात कंगनानं उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते, कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वादामुळेच मुंबई महापालिकेने तत्परतेने कारवाई केली असा आरोप विरोधकांनी केला होता, या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून ‘उखाड दिया’ अशा हेडिंगने बातमी दिली होती.

कॉमेडियन कुणाल कामराच्या कार्यक्रमात या हेडिंगवरुन संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर संजय राऊत यांनी कंगनाचं नाव घेता तिला फटकारलं, राऊत म्हणाले की, अभिनेत्रीच्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली,ती कारवाई आम्ही केली नाही, परंतु सामनाची स्वत:ची स्टाईल आहे, हेडलाईन वेगळी असते. कंगना राणौत म्हणाली होती, मी मुंबईत येतेय, कोणालाही काही उखडायचं असेल तर उखडावं, त्यामुळे महिलेचा सन्मान करणं आमचं काम आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने ती कारवाई केल्यावर आम्ही तशा आशयाची हेडलाईन देऊन बातमी केली असा टोला राऊतांनी लगावला.

तसेच अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जेसीबी खूप महत्वाचं असतं, मुंबईत अनेक अनधिकृत बांधकामे आहेत, स्टुडिओपण अनधिकृत कामं आहेत, एक फिल्मी डायलॉग आहे “जिनके घर शिशे के होते है वो दुसरो के घरपर पत्थर नही फेका करते” त्यामुळे आमच्याकडे दगड(पत्थर) आहेत, ते बाहेरून फेकू शकतो आणि आतमधूनही फेकू शकतो. जर तुम्ही काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, काही चुकीची काम लपवण्यासाठी गप्प बसावं, आमच्यावर दगडं फेकू नयेत, आम्ही तुम्हाला अनेकदा मदत केली आहे असा इशारा संजय राऊत यांनी कंगना राणौतला दिला आहे.

“हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशी तुमचीही होऊ शकते”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा

सुशांत बिहारचा नव्हे तर मुंबईचा मुलगा

सुशांत सिंग राजूपतला मी बिहारचं मानत नाही, तो मुंबईचा आहे, मुंबईत येऊन सुशांतची ओळख निर्माण झाली, सुशांत आमचा मुलगा आहे, त्याच्यासोबत चुकीचं झालं असेल तर आम्ही त्याला न्याय देऊ, किंचाळूच चुकीचं बोलणं खरं होत नाही. जे सत्य असते ते शांतपणेही त्याचं काम सुरु ठेवतं. जे सत्य आहे ते लपवून नवीन काही शोधायचं प्रयत्न सुरू होता असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

“या देशात कोणीही सेक्युलर नाही, सेक्युलरची भाषा करणारे सर्वात जास्त धर्मांध"

तसेच सुशांत राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची तुम्हाला कोणाची ऑर्डर होती का? ठराविक लोकांनाच टार्गेट करायचं हे सांगितलं होतं का? मुंबई पोलिसांनी जो तपास केला तो शतप्रतिशत खरा होता, जगातील सर्वोत्तम पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांचा समावेश आहे. वर्दीचा सन्मान राखला पाहिजे, मुंबई पोलिसांना माफिया म्हणता आणि त्यांच्याच सुरक्षेत फिरता, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतात, शरद पवारांविरोधात बोलतात, त्या व्यक्तींसोबत पोलिसांनी राहू नये हे आम्ही बोललो नाही. पोलीस त्यांचे काम करतात, त्या व्यक्तीची सुरक्षा करणे हे सरकारचं काम आहे असं राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKangana Ranautकंगना राणौतMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाShiv Senaशिवसेना