शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवलेंचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 5:58 PM

West bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 15 उमेदवार स्वबळावर निवडणूक लढत असून रिपाइं उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यावर रामदास आठवले पश्चिम बंगालमध्ये आले आहेत.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून रिपाइं 15 जागा स्वबळावर लढत असून उर्वरित 279 जागांवर रिपाइंचा भाजपाला पाठिंबा आहे. 

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रचारसभेला सुरूवात केली आहे. (Union minister Ramdas Athawale said, Mamata Banerjee impoverished Bengal during her 10 years in power)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या सत्ताकाळात पश्चिम बंगालला कंगाल केले आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे. आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील तारुकेश्वर विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार संजीव चक्रवर्ती यांच्या प्रचारसभेत बोलत होते. 

रामदास आठवले दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर येथे आले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 15 उमेदवार स्वबळावर निवडणूक लढत असून रिपाइं उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यावर रामदास आठवले पश्चिम बंगालमध्ये आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून रिपाइं 15 जागा स्वबळावर लढत असून उर्वरित 279 जागांवर रिपाइंचा भाजपाला पाठिंबा आहे. 

पश्चिम बंगालमध्ये दलितांची लोकसंख्या 36 टक्के असून दलितांचे मतदान निर्णायक ठरणारे आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसने बंगालला कंगाल केले आहे. मात्र, पश्चिम बंगालला सोनार बंगाल करण्यासाठी येथील दलिततांचा  पाठिंबा भाजपाला मिळणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे 15 उमेदवार विधानसभा निवडणूक लढत असून त्यात जे उमेदवार विजयी होतील त्यांचा भाजपाला पाठिंबा राहील, अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली.  

(निवडणुकीत 'जय श्रीराम'चा नारा; योगींनी चार सभेत 80 वेळा तर अमित शाहांनी 26 वेळा घेतले रामाचे नाव)

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सोडून आता पर्यंत 64 आमदार बाहेर पडले आहेत.  अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष सोडला आहे. एखादा पक्ष सोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी बाहेर पडण्याचे  देशात तृणमूल काँग्रेस हे एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालला सोनार बंगाल करण्यासाठी भाजपाला संधी मिळेल. पश्चिम बंगालचे दलित आणि अल्पसंख्यांक भाजपाला विजयी करतील. पश्चिम बंगाल च्या विकासासाठी रिपाइं आणि भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल