शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवलेंचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 18:13 IST

West bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 15 उमेदवार स्वबळावर निवडणूक लढत असून रिपाइं उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यावर रामदास आठवले पश्चिम बंगालमध्ये आले आहेत.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून रिपाइं 15 जागा स्वबळावर लढत असून उर्वरित 279 जागांवर रिपाइंचा भाजपाला पाठिंबा आहे. 

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रचारसभेला सुरूवात केली आहे. (Union minister Ramdas Athawale said, Mamata Banerjee impoverished Bengal during her 10 years in power)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या सत्ताकाळात पश्चिम बंगालला कंगाल केले आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे. आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील तारुकेश्वर विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार संजीव चक्रवर्ती यांच्या प्रचारसभेत बोलत होते. 

रामदास आठवले दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर येथे आले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 15 उमेदवार स्वबळावर निवडणूक लढत असून रिपाइं उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यावर रामदास आठवले पश्चिम बंगालमध्ये आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून रिपाइं 15 जागा स्वबळावर लढत असून उर्वरित 279 जागांवर रिपाइंचा भाजपाला पाठिंबा आहे. 

पश्चिम बंगालमध्ये दलितांची लोकसंख्या 36 टक्के असून दलितांचे मतदान निर्णायक ठरणारे आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसने बंगालला कंगाल केले आहे. मात्र, पश्चिम बंगालला सोनार बंगाल करण्यासाठी येथील दलिततांचा  पाठिंबा भाजपाला मिळणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे 15 उमेदवार विधानसभा निवडणूक लढत असून त्यात जे उमेदवार विजयी होतील त्यांचा भाजपाला पाठिंबा राहील, अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली.  

(निवडणुकीत 'जय श्रीराम'चा नारा; योगींनी चार सभेत 80 वेळा तर अमित शाहांनी 26 वेळा घेतले रामाचे नाव)

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सोडून आता पर्यंत 64 आमदार बाहेर पडले आहेत.  अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष सोडला आहे. एखादा पक्ष सोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी बाहेर पडण्याचे  देशात तृणमूल काँग्रेस हे एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालला सोनार बंगाल करण्यासाठी भाजपाला संधी मिळेल. पश्चिम बंगालचे दलित आणि अल्पसंख्यांक भाजपाला विजयी करतील. पश्चिम बंगाल च्या विकासासाठी रिपाइं आणि भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल