शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मालेगावी दादा जिंकले, दादा हरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 22:47 IST

राज्यमंत्री दादा भुसे व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा मविप्रचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांच्यात काट्याची लढत झाली. ‘दादा’ विरुद्ध ‘दादा’ यांच्यात झालेल्या लढतीत अखेर एका दादाला पराभवाला सामोरे जावे लागले.

मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार तथा ग्राकॉँग्रेस - राष्टÑवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांचे निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसात चुकलेले नियोजन व गावोगावच्या कार्यकर्त्यांना वेळेवर ‘रसद’ न पोहोचल्याने भुसे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. सलग तीन टर्म बाह्य मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करून यंदाही विजयाचा चौकार मारून भुसेंनी मुरब्बी राजकारणी असल्याचे विरोधकांना दाखवून दिले आहे.नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर तालुक्यात प्रचाराचा धुराळा उडाला होता. भुसेंचा विजयाचा वारू रोखण्यासाठी विरोधक एकवटले होते.भुसे यांनी तालुक्यात केलेली विकासकामे, औद्योगिक वसाहत, अतिक्रमण नियमनाकुल, रस्ते, स्वतंत्र महिला व बालरुग्णालय, उद्यान आदी कामांच्या बळावर तसेच जिल्हा व रोजगार निर्मितीचे प्रश्न मतदारांपुढे घेऊन जाऊन प्रचार केला. स्थानिक स्वराज्य संस्थांवर भुसेंचे वर्चस्व आहे. भाजपचे गटनेते सुनील गायकवाड यांनी शहरातील डॅमेज कंट्रोल रोखीत भुसेंना मोठे मताधिक्य मिळवून दिले, तर डॉ. तुषार शेवाळे यांनी तालुक्याचा रखडलेला विकासाचा मुद्दा मतदारांपुढे नेला होता. शेवटच्या दोन दिवसात शेवाळे यांची प्रचार यंत्रणा कोलमडून पडली. डॉ. शेवाळे यांच्याकडे प्रचार यंत्रणा हाताळणारी यंत्रणा स्थानिक राजकारण्यांना ओळखत नव्हती परिणामी गावोगावच्या कार्यकर्त्यांना रसद पुरवली गेली नाही. हीच संधी ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांच्या समर्थकांनी साधत शेवटचे दोन दिवस झोकून देत प्रचार करत विजयश्री खेचून आणली.

टॅग्स :Nashikनाशिक