शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाणांची विजयी हॅटट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 05:04 IST

सुमारे २० तास मतमोजणी चालली, रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला.

औरंगाबाद – मराठवाडा पदवीधर मतदरासंघ निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस होईल अशी शक्यता होती, परंतु पदवीधर मतदारांनी सच का साथ देत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिली पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते देत तब्बल ५७ हजार ८९५ मताधिक्याने विजयी केले, त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली.

चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली विजयी आघाडी पाचव्या फेरीअखेर कायम ठेवली, ३५ उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चव्हाण आणि महायुतीचे उमेदवार बोराळकर यांच्यात मुख्य लढत झाली, दुसऱ्या फेरी अंतीच चव्हाणांची विजयाकडे घौडदौड दिसून आली, सुमारे २० तास मतमोजणी चालली, रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला.

पहिल्या फेरीत चव्हाण यांना २७ हजार २५० मते मिळाली, तर बोराळकर यांना ११ हजार २७२ मते मिळाली, सिद्धेश्वर मुंडे यांना २५०६ , रमेश पोकळे यांना ३ हजार ४७८ मते मिळाली, चव्हाण यांना पहिल्या फेरीअंतीच बोराळकर यांच्यापेक्षा दुप्पट मते मिळाली, दुसऱ्या फेरीअखेरीस शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण ३४ हजार मतांची आघाडी घेतली, दुसऱ्या फेरीअखेरीस भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर प्रचंड मागे पडले होते.

तिसऱ्या फेरीत सतीश चव्हाण यांना २६ हजार ७३९ मते मिळाल्याने त्यांची एकूण मते ८१ हजार २१६ पर्यंत पोहचली, या फेरीत शिरीष बोराळकरांना १४ हजार ४७१ मते मिळाली, त्याची एकूण मते ४० हजार १८ झाली होती, या फेरी अखेर चव्हाण यांचे मताधिक्य ४१ हजार २०५ पर्यंत पोहचले होते, या फेरीपर्यंत १ लाख ५३ हजार ३० मतांची मोजणी पूर्ण झाली होती, तिसरी फेरी रात्री दीड वाजता घोषित झाली,

चौथ्या फेरीअखेरीस चव्हाण यांना १ लाख ७ हजार ९१६ मते तर भाजपाचे उमेदवार बोराळकर यांना ५४ हजार ३०५ मते मिळाली, या फेरीअखेरीस २१ हजार ३८८ मते बाद झाली, चौथ्या फेरीअखेर २ लाख २५ हजार ७४ मतांची मोजणी झाली, एकूण २ लाख ४० हजार मतदान झाले होते.

भाजपा नेत्यांचा काढता पाय

पहिल्या फेरीची मतमोजणी जाहीर होण्यापूर्वीच भाजपा नेत्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला, उमेदवार शिरीष बोराळकर, खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, विजय औताडे आदींनी मतमोजणी केंद्र सोडले, संजय केणेकर आणि प्रमोद राठोड हे तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीपर्यंत केद्रात होते.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना