शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

Maharashtra Vidhan Sabha: शिवसेना आमदार भास्कर जाधव संतापले; विरोधकांवर गंभीर आरोप लावले

By प्रविण मरगळे | Updated: March 9, 2021 15:20 IST

Maharashtra Budget Session: Bhaskar Jadhav Target Devendra Fadnavis over Mansukh Hiren Death Controversy: इतकचं नाही तर आमचं केंद्रात सरकार आहे, त्यामुळे विरोधकांना असं वाटतंय आमचं कोणी काही करू शकत नाही. राज्यानं ज्यांचे संरक्षण काढलं अशा गुंडांना केंद्राने संरक्षण दिलं.

ठळक मुद्देसचिन वाझे तपास अधिकारी राहिला तर विरोधकांचे बिंग फुटेल याची भीती देवेंद्र फडणवीसांना आहे सभागृहात इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर गदारोळ होत असताना मुख्यमंत्री कुठे आहेत...?गृहमंत्र्यांना खुलं आव्हान आहे, कर नाही त्याला डर कशाला....माझी चौकशी करावी

मुंबई – मुकेश अंबानी(Mukesh Ambani) प्रकरणातील स्कोर्पिओ गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. मनसुख हिरेन(Mansukh Hiren) प्रकरणावरून विरोधकांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर थेट खूनाचे आरोप केले. यावरून सभागृहात गोंधळ माजला, सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गोंधळामध्ये विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.

याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव(Shivsena Bhaskar Jadhav) यांनी विरोधकांवर आक्रमक निशाणा साधला, जाधव म्हणाले की, २०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी हे प्रकरण दाबून टाकले, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अन्वय नाईक(Anavay Naik Suicide Case) यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सासू आणि नवऱ्याच्या मृत्यूची चौकशी करावी असं पत्र दिलं, देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण दाबलं असंही म्हटलं, या प्रकरणाची चौकशी सचिन वाझे करत आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप करून त्यांना काढून टाकण्याची मागणी केली जातेय, पण सरकार सचिन वाझेंना काढणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला.

इतकचं नाही तर आमचं केंद्रात सरकार आहे, त्यामुळे विरोधकांना असं वाटतंय आमचं कोणी काही करू शकत नाही. राज्यानं ज्यांचे संरक्षण काढलं अशा गुंडांना केंद्राने संरक्षण दिलं. जस्टिस लोया यांची नागपूरात हत्या कशी झाली? हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावे. सचिन वाझे(Sachin Vaze) तपास अधिकारी राहिला तर विरोधकांचे बिंग फुटेल याची भीती देवेंद्र फडणवीसांना आहे असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला यावर देवेंद्र फडणवीसांनीही चोख उत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सभागृहात इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर गदारोळ होत असताना मुख्यमंत्री कुठे आहेत...? पोलीस लोकांची हत्या करतायेत. सचिन वाझे यांना कोणाच्या दबावाखाली वाचवण्याचं काम सुरू आहे. अन्वय नाईक प्रकरणात हायकोर्टाने काय म्हटलंय हे भास्कर जाधव यांना माहिती नाही. गृहमंत्र्यांना खुलं आव्हान आहे, कर नाही त्याला डर कशाला....माझी चौकशी करावी....धमक्या देऊन सचिन वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायेत का? असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला विचारला.

काय म्हणाले गृहमंत्री?

अन्वय नाईक यांची आत्महत्या झाली, त्यांच्याबद्दल त्यांच्या मुलगी आणि पत्नीने तक्रार केली, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही केस दाबली त्याची चौकशी करायची आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख(Home Minister Anil Deshmukh) म्हणाले होते.

तर सचिन वाझे, अन्वय नाईक, मनसुख हिरेन या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ सुरू असताना काँग्रेस आमदार नाना पटोले(Congress Nana Patole) म्हणाले की,कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे, अशात सोशल डिस्टेसिंगचं पालन करणं महत्त्वाचं आहे, तरीही विरोधकांनी नियमांची पायमल्ली करून सभागृहात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडवला आहे, प्रेक्षक गॅलरीतील आमदारही सभागृहात आले आहेत, कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणBhaskar Jadhavभास्कर जाधवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAnvay Naikअन्वय नाईकUddhav Thackerayउद्धव ठाकरे