शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Maharashtra Vidhan Sabha: शिवसेना आमदार भास्कर जाधव संतापले; विरोधकांवर गंभीर आरोप लावले

By प्रविण मरगळे | Updated: March 9, 2021 15:20 IST

Maharashtra Budget Session: Bhaskar Jadhav Target Devendra Fadnavis over Mansukh Hiren Death Controversy: इतकचं नाही तर आमचं केंद्रात सरकार आहे, त्यामुळे विरोधकांना असं वाटतंय आमचं कोणी काही करू शकत नाही. राज्यानं ज्यांचे संरक्षण काढलं अशा गुंडांना केंद्राने संरक्षण दिलं.

ठळक मुद्देसचिन वाझे तपास अधिकारी राहिला तर विरोधकांचे बिंग फुटेल याची भीती देवेंद्र फडणवीसांना आहे सभागृहात इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर गदारोळ होत असताना मुख्यमंत्री कुठे आहेत...?गृहमंत्र्यांना खुलं आव्हान आहे, कर नाही त्याला डर कशाला....माझी चौकशी करावी

मुंबई – मुकेश अंबानी(Mukesh Ambani) प्रकरणातील स्कोर्पिओ गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. मनसुख हिरेन(Mansukh Hiren) प्रकरणावरून विरोधकांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर थेट खूनाचे आरोप केले. यावरून सभागृहात गोंधळ माजला, सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गोंधळामध्ये विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.

याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव(Shivsena Bhaskar Jadhav) यांनी विरोधकांवर आक्रमक निशाणा साधला, जाधव म्हणाले की, २०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी हे प्रकरण दाबून टाकले, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अन्वय नाईक(Anavay Naik Suicide Case) यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सासू आणि नवऱ्याच्या मृत्यूची चौकशी करावी असं पत्र दिलं, देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण दाबलं असंही म्हटलं, या प्रकरणाची चौकशी सचिन वाझे करत आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप करून त्यांना काढून टाकण्याची मागणी केली जातेय, पण सरकार सचिन वाझेंना काढणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला.

इतकचं नाही तर आमचं केंद्रात सरकार आहे, त्यामुळे विरोधकांना असं वाटतंय आमचं कोणी काही करू शकत नाही. राज्यानं ज्यांचे संरक्षण काढलं अशा गुंडांना केंद्राने संरक्षण दिलं. जस्टिस लोया यांची नागपूरात हत्या कशी झाली? हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावे. सचिन वाझे(Sachin Vaze) तपास अधिकारी राहिला तर विरोधकांचे बिंग फुटेल याची भीती देवेंद्र फडणवीसांना आहे असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला यावर देवेंद्र फडणवीसांनीही चोख उत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सभागृहात इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर गदारोळ होत असताना मुख्यमंत्री कुठे आहेत...? पोलीस लोकांची हत्या करतायेत. सचिन वाझे यांना कोणाच्या दबावाखाली वाचवण्याचं काम सुरू आहे. अन्वय नाईक प्रकरणात हायकोर्टाने काय म्हटलंय हे भास्कर जाधव यांना माहिती नाही. गृहमंत्र्यांना खुलं आव्हान आहे, कर नाही त्याला डर कशाला....माझी चौकशी करावी....धमक्या देऊन सचिन वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायेत का? असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला विचारला.

काय म्हणाले गृहमंत्री?

अन्वय नाईक यांची आत्महत्या झाली, त्यांच्याबद्दल त्यांच्या मुलगी आणि पत्नीने तक्रार केली, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही केस दाबली त्याची चौकशी करायची आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख(Home Minister Anil Deshmukh) म्हणाले होते.

तर सचिन वाझे, अन्वय नाईक, मनसुख हिरेन या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ सुरू असताना काँग्रेस आमदार नाना पटोले(Congress Nana Patole) म्हणाले की,कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे, अशात सोशल डिस्टेसिंगचं पालन करणं महत्त्वाचं आहे, तरीही विरोधकांनी नियमांची पायमल्ली करून सभागृहात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडवला आहे, प्रेक्षक गॅलरीतील आमदारही सभागृहात आले आहेत, कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणBhaskar Jadhavभास्कर जाधवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAnvay Naikअन्वय नाईकUddhav Thackerayउद्धव ठाकरे