शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Vidhan Sabha Adhiveshan: सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:53 IST

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: भास्कर जाधवांना(Bhaskar Jadhav) एकतर तालिकेवर घ्या अन्यथा मुख्यमंत्र्यांनी मंत्री करावं. ते अतिशय अस्वस्थ आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) आणि नाना पटोले(Nana Patole) यांच्या जुंपल्याचं दिसून आलं.घटनेनुसार सभागृहाचं कामकाज चालावं हे बोलणं म्हणजे सरकारच्या विरोधात नाही. आयुधं सरसकट गोठवण्याचा अधिकार सरकारला नाही. लोकशाहीला कुलूप कसं लावता येईल?

मुंबई – विधिमंडळाच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. विधिमंडळातील आयुधं गोठवण्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गोंधळ झाला. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार विरुद्ध नाना पटोले, भास्कर जाधव आमनेसामने आल्याचं दिसून आले.

यावेळी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, तारांकित प्रश्न नाही आणि प्रश्नोत्तरे नाहीत, संसदीय आयुधं गोठवण्याचं काम देशात कुठल्याही विधानसभेने केले नाही. आयुधं सरसकट गोठवण्याचा अधिकार सरकारला नाही. लोकशाहीला कुलूप कसं लावता येईल? आयुधं वापरण्याचा आमचा अधिकार पुन्हा मिळाला पाहिजे. आजच विधेयक मांडायचे आणि आजचं पास करायचे? पहिल्या दिवशीची कार्यक्रमपत्रिका रात्री १० वाजेपर्यंत मिळत नाही. विधिमंडळात विरोधकांची मुस्कटदाबी होणार असेल तर ते योग्य नाही असं ते म्हणाले.

तसेच भास्कर जाधवांना(Bhaskar Jadhav) एकतर तालिकेवर घ्या अन्यथा मुख्यमंत्र्यांनी मंत्री करावं. ते अतिशय अस्वस्थ आहेत. सातत्याने खाली बसून सभागृहात बोलणं, हातवारे करणे हे सभागृहात चालत नाही. हे योग्य नाही. यांनी बोलून दिलं नाही तर आमचेही सदस्य बोलून देणार नाहीत असं सभागृह चालवायचं आहे का? असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

यावेळी सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) आणि नाना पटोले(Nana Patole) यांच्या जुंपल्याचं दिसून आलं. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,  विधानसभेचे कामकाज परंपरेनुसार आणि नियमांनुसार होतं. कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार वागत असेल तर याबाबत जे विधानसभेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करा. घटनेनुसार सभागृहाचं कामकाज चालावं हे बोलणं म्हणजे सरकारच्या विरोधात नाही. स्थगन प्रस्ताव तातडीच्या प्रश्नावर विचारला जातो तोही अधिकार आम्हाला नाही. जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही. ही राजेशाही आहे. विधानसभा अध्यक्ष हे आमचं संरक्षण आहे. कोरोनाबाबत चिंता असायला हवी. परंतु अधिवेशनापासून पळ का काढला जातो. आमदारांनी पत्र दिल्यानंतर त्याचे उत्तर देणं बंधनकारक आहेत. परंतु आम्हाला उत्तरं दिली जात नाही. आकडेवारी दिली जात नाही. आमदारांची इज्जत आहे की नाही. आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी आलो. आमदारांच्या पत्रांची नोंदवही ठेवली जात नाही. हक्कभंग टाकण्याचा अधिकारही काढून घेतला. कोरोनानंतर आमदारांचे सर्व अधिकार परत घेतले आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी मुनगंटीवार बोलत असताना भास्कर जाधव सरकारच्या बाजूने त्यांना विरोध करत होते. तेव्हा अनिल देशमुख मधात बोलले आणि आत जात आहे. सरकारचे चमचेगिरी करण्याची काय गरज नाही. मी नियमांबाबत बोलत आहे असं मुनगंटीवार म्हणाले त्यावर नाना पटोलेंनी आक्षेप घेत सुधीर मुनगंटीवार आम्हाला धमकी देतायेत, सभागृहात धमकी दिली जाते. हे बरोबर नाही असं सांगितले. तर मंत्री नवाब मलिक यांनी सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल तर सरकारच्या बाजूने त्याला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही सरकारचे चमचेगिरी करण्यासाठी आहात हे बोलणं योग्य नाही असं म्हटलं.

या संपूर्ण प्रकारावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, पॉईंट ऑफ प्रोसिजरवर बोलत असताना मला जेलमध्ये टाकण्याची धमकी सुधीर मुनगंटीवारांनी दिली. भाजपाविरोधात जो कुणी बोलेल त्याला जेल, सीबीआय, ईडी हेच महाराष्ट्रात चाललंय. तुम्ही १०० कोटी बोलता ते तुमच्या दृष्टीने कमीच आहे. दिल्लीचं भाजपा कार्यालय कशाच्या जोरावर बांधलं? बीएसईमधील कामकाजाचा उल्लेख सभागृहात करायचा नसतो याची समज विरोधकांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारNana Patoleनाना पटोलेBhaskar Jadhavभास्कर जाधवvidhan sabhaविधानसभा