शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Adhiveshan: सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:53 IST

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: भास्कर जाधवांना(Bhaskar Jadhav) एकतर तालिकेवर घ्या अन्यथा मुख्यमंत्र्यांनी मंत्री करावं. ते अतिशय अस्वस्थ आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) आणि नाना पटोले(Nana Patole) यांच्या जुंपल्याचं दिसून आलं.घटनेनुसार सभागृहाचं कामकाज चालावं हे बोलणं म्हणजे सरकारच्या विरोधात नाही. आयुधं सरसकट गोठवण्याचा अधिकार सरकारला नाही. लोकशाहीला कुलूप कसं लावता येईल?

मुंबई – विधिमंडळाच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. विधिमंडळातील आयुधं गोठवण्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गोंधळ झाला. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार विरुद्ध नाना पटोले, भास्कर जाधव आमनेसामने आल्याचं दिसून आले.

यावेळी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, तारांकित प्रश्न नाही आणि प्रश्नोत्तरे नाहीत, संसदीय आयुधं गोठवण्याचं काम देशात कुठल्याही विधानसभेने केले नाही. आयुधं सरसकट गोठवण्याचा अधिकार सरकारला नाही. लोकशाहीला कुलूप कसं लावता येईल? आयुधं वापरण्याचा आमचा अधिकार पुन्हा मिळाला पाहिजे. आजच विधेयक मांडायचे आणि आजचं पास करायचे? पहिल्या दिवशीची कार्यक्रमपत्रिका रात्री १० वाजेपर्यंत मिळत नाही. विधिमंडळात विरोधकांची मुस्कटदाबी होणार असेल तर ते योग्य नाही असं ते म्हणाले.

तसेच भास्कर जाधवांना(Bhaskar Jadhav) एकतर तालिकेवर घ्या अन्यथा मुख्यमंत्र्यांनी मंत्री करावं. ते अतिशय अस्वस्थ आहेत. सातत्याने खाली बसून सभागृहात बोलणं, हातवारे करणे हे सभागृहात चालत नाही. हे योग्य नाही. यांनी बोलून दिलं नाही तर आमचेही सदस्य बोलून देणार नाहीत असं सभागृह चालवायचं आहे का? असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

यावेळी सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) आणि नाना पटोले(Nana Patole) यांच्या जुंपल्याचं दिसून आलं. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,  विधानसभेचे कामकाज परंपरेनुसार आणि नियमांनुसार होतं. कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार वागत असेल तर याबाबत जे विधानसभेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करा. घटनेनुसार सभागृहाचं कामकाज चालावं हे बोलणं म्हणजे सरकारच्या विरोधात नाही. स्थगन प्रस्ताव तातडीच्या प्रश्नावर विचारला जातो तोही अधिकार आम्हाला नाही. जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही. ही राजेशाही आहे. विधानसभा अध्यक्ष हे आमचं संरक्षण आहे. कोरोनाबाबत चिंता असायला हवी. परंतु अधिवेशनापासून पळ का काढला जातो. आमदारांनी पत्र दिल्यानंतर त्याचे उत्तर देणं बंधनकारक आहेत. परंतु आम्हाला उत्तरं दिली जात नाही. आकडेवारी दिली जात नाही. आमदारांची इज्जत आहे की नाही. आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी आलो. आमदारांच्या पत्रांची नोंदवही ठेवली जात नाही. हक्कभंग टाकण्याचा अधिकारही काढून घेतला. कोरोनानंतर आमदारांचे सर्व अधिकार परत घेतले आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी मुनगंटीवार बोलत असताना भास्कर जाधव सरकारच्या बाजूने त्यांना विरोध करत होते. तेव्हा अनिल देशमुख मधात बोलले आणि आत जात आहे. सरकारचे चमचेगिरी करण्याची काय गरज नाही. मी नियमांबाबत बोलत आहे असं मुनगंटीवार म्हणाले त्यावर नाना पटोलेंनी आक्षेप घेत सुधीर मुनगंटीवार आम्हाला धमकी देतायेत, सभागृहात धमकी दिली जाते. हे बरोबर नाही असं सांगितले. तर मंत्री नवाब मलिक यांनी सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल तर सरकारच्या बाजूने त्याला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही सरकारचे चमचेगिरी करण्यासाठी आहात हे बोलणं योग्य नाही असं म्हटलं.

या संपूर्ण प्रकारावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, पॉईंट ऑफ प्रोसिजरवर बोलत असताना मला जेलमध्ये टाकण्याची धमकी सुधीर मुनगंटीवारांनी दिली. भाजपाविरोधात जो कुणी बोलेल त्याला जेल, सीबीआय, ईडी हेच महाराष्ट्रात चाललंय. तुम्ही १०० कोटी बोलता ते तुमच्या दृष्टीने कमीच आहे. दिल्लीचं भाजपा कार्यालय कशाच्या जोरावर बांधलं? बीएसईमधील कामकाजाचा उल्लेख सभागृहात करायचा नसतो याची समज विरोधकांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारNana Patoleनाना पटोलेBhaskar Jadhavभास्कर जाधवvidhan sabhaविधानसभा