शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

Maharashtra Vidhan Sabha: गांज्यापासून मांज्यापर्यंत! मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'नारायण भंडारी' गोष्ट; सभागृहात एकच गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 16:41 IST

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री आक्रमक; भाजपचा समाचार

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांचा मुख्यमंत्र्यांनी जोरदार समाचार घेतला आहे. कोरोना, हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर, औरंगाबादचं नामांतर यासारख्या अनेक विषयांवरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांची चर्चा पाहून मला नटसम्राट पाहिल्याचा भास झाल्याचं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला. (CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha)टीम इंडिया आता प्रत्येक सामना जिंकणार, कारण स्टेडियमचं नाव बदललंय; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोलाराज्यपाल कोश्यारींनी राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती त्यांच्या अभिभाषणातून दिली. त्यांनी सरकारचं कौतुक केलं. ते पचवणं अनेकांना जड गेलं. कारण ते कौतुक अनपेक्षित होतं. राज्यपाल म्हणजे व्यक्ती नाही, ती संस्था आहे, असं विरोधक म्हणतात. त्यामुळेच त्यांचं भाषण महत्त्वाचं आहे. राज्यपाल मराठीत बोलले हेही नसे थोडके, असं मुख्यमंत्री म्हणाले. मी कोरोना काळातला सगळा हिशोब देतो. तुम्ही केंद्राकडून पीएम केअर्सचा हिशोब मागणार का, असा सवाल त्यांनी विरोधकांनी विचारला. तुम्हा माझ्याकडे हिशोब मागू शकता. पण पीएम केअर्सची माहिती आरटीआयमध्येही येत नाही आणि काही विचारलं तर तो देशद्रोह ठरतो. ही यांची लोकशाही, असा टोला त्यांनी लगावला."...तेव्हा नटसम्राट पाहत असल्याचा भास झाला," उद्धव ठाकरेंचा सुधीर मुनगंटीवारांना टोलामुख्यमंत्र्यांनी सांगितली 'नारायण भंडारी'ची गोष्टविरोधकांकडे पाहत आज मी तुम्हाला नारायण भंडारीची गोष्ट सांगणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 'तुम्ही मला एका नारायण भंडारीची गोष्ट सांगितली. तोच नारायण भंडारी पुढे मोठा होतो. गाव सोडून जातो. मोठा माणूस होतो आणि एकदा स्वत:च्या गाडीनं गावाला येतो. तो गुरुजींच्या भेटीला जातो. मला ओळखलं का असं विचारतो. गुरुजी त्याचं कौतुक करतात. टीव्हीवर तुला रोज पाहतो म्हणतात. गांजापासून पतंगाच्या मांजापर्यंत आणि जमिनीतल्या पाण्यापासून मंगळावरच्या पाण्यापर्यंत बोलणाऱ्या नारायणचं कौतुक करतात,' अशी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.फडणवीसांना मुख्यमंत्र्यांचा टोला, कोरोना व्हायरस म्हणाला, 'मी पुन्हा येईन'...मी तरी तुला हे सगळं शिकवलं नाही. मग तू हे कोणाकडू शिकलास, अशी विचारणा गुरुजी करतात. त्यावर मी गुरुच बदलला. मी ज्या क्षेत्रात काम करतो, त्या ठिकाणी असंच रेटून बोलावं लागत असल्याचं नारायण सांगतो. गुरुजी नारायणला जेवायला थांबण्यास सांगतात. पण नारायण म्हणतो, मला एक पत्रकार परिषद घ्यायची आहे. आता कोविड रुग्णालयात भ्रष्टाचार बाहेर काढणारी पत्रकार परिषद घेऊन आलो. आता दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी दुसरी पत्रकार परिषद घ्यायची असल्याचं नारायण गुरुजींना सांगतो आणि त्यांचा निरोप घेतो, अशी कथा मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यानंतर विधानसभेत एकच गदारोळ झाला. त्यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार