शहरं
Join us  
Trending Stories
1
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
2
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
3
अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
4
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
5
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
6
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
7
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
8
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
9
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
10
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
11
Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
12
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
13
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
14
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
15
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
16
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
17
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
18
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
19
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
20
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
Daily Top 2Weekly Top 5

Flood: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये माणुसकी आहे का? राज्याला ड्रायव्हर नको; केंद्रीय मंत्री नारायण राणे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 12:17 IST

Ratnagiri, Raigad, Chiplun Flood: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन केंद्राला कळवलं आहे. केंद्राकडून जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती कोकणात निर्माण झाली आहे. ३५० मिली पाऊस पडलेला आहे.हेलिकॉप्टर, बोटी, सैन्याची मदत केंद्राकडून करण्यात येत आहे. संबंधित मंत्र्यांशी माझं बोलणं झालं आहे. राज्य सरकारकडून उपाययोजना होणं गरजेचे होते. मुख्यमंत्र्यांना माणुसकी आहे का?

मुंबई – राज्यात रत्नागिरी, रायगडसह संपूर्ण कोकणाला पुराचा मोठा फटका बसला आहे. १०-१२ फूट पाणी साचल्यानं अनेक शहरांशी संपर्क तुटला आहे. अनेकांची घरं पाण्याखाली गेली आहेत. लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम कार्यरत आहेत. केंद्राकडून आवश्यक ती मदत कोकणाला पुरवण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. केंद्र सरकार आवश्यक ती मदत करेल अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी दिली आहे.

नारायण राणे पत्रकारांना म्हणाले की, अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती कोकणात निर्माण झाली आहे. ३५० मिली पाऊस पडलेला आहे. याठिकाणी हेलिकॉप्टर, बोटीच्या सहाय्याने लोकांना वाचवणं गरजेचे आहे. लोकांना अन्नपुरवठा करणं, सुरक्षितस्थळी नेणं गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्याशी बोललेलो आहे. हेलिकॉप्टर, बोटी, सैन्याची मदत केंद्राकडून करण्यात येत आहे. संबंधित मंत्र्यांशी माझं बोलणं झालं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन केंद्राला कळवलं आहे. केंद्राकडून जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांमध्ये माणुसकी आहे का?

४८ तासांत कोकणात इतका पाऊस पडला आहे. राज्य सरकारला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. अतिवृष्टीमुळे कोकणातील लोकांची जीव धोक्यात येतो. राज्य सरकारकडून उपाययोजना होणं गरजेचे होते. मुख्यमंत्र्यांना माणुसकी आहे का? गाडी चालवत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले. परंतु चेंबूर, विक्रोळीला अतिवृष्टीनं घरं कोसळली, जे मृत पावलेले त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत? राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचा हित करणारा मुख्यमंत्री हवा. ड्रायव्हर शासनाकडे हजारो आहेत. गाडी चालवायची असेल तर कॅबिनेटला जा, मंत्रालयात जाऊन काम करा. राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती आहे. विकास ठप्प आहे अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर(CM Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.

कोकणात पुराचा हाहाकार

आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार तिलारी नदी धोका पातळीला पोचली असून कर्ली आणि वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 43.600 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 10 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 9.600 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

टॅग्स :Ratnagiri Floodरत्नागिरी पूरchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे