शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Flood: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये माणुसकी आहे का? राज्याला ड्रायव्हर नको; केंद्रीय मंत्री नारायण राणे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 12:17 IST

Ratnagiri, Raigad, Chiplun Flood: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन केंद्राला कळवलं आहे. केंद्राकडून जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती कोकणात निर्माण झाली आहे. ३५० मिली पाऊस पडलेला आहे.हेलिकॉप्टर, बोटी, सैन्याची मदत केंद्राकडून करण्यात येत आहे. संबंधित मंत्र्यांशी माझं बोलणं झालं आहे. राज्य सरकारकडून उपाययोजना होणं गरजेचे होते. मुख्यमंत्र्यांना माणुसकी आहे का?

मुंबई – राज्यात रत्नागिरी, रायगडसह संपूर्ण कोकणाला पुराचा मोठा फटका बसला आहे. १०-१२ फूट पाणी साचल्यानं अनेक शहरांशी संपर्क तुटला आहे. अनेकांची घरं पाण्याखाली गेली आहेत. लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम कार्यरत आहेत. केंद्राकडून आवश्यक ती मदत कोकणाला पुरवण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. केंद्र सरकार आवश्यक ती मदत करेल अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी दिली आहे.

नारायण राणे पत्रकारांना म्हणाले की, अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती कोकणात निर्माण झाली आहे. ३५० मिली पाऊस पडलेला आहे. याठिकाणी हेलिकॉप्टर, बोटीच्या सहाय्याने लोकांना वाचवणं गरजेचे आहे. लोकांना अन्नपुरवठा करणं, सुरक्षितस्थळी नेणं गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्याशी बोललेलो आहे. हेलिकॉप्टर, बोटी, सैन्याची मदत केंद्राकडून करण्यात येत आहे. संबंधित मंत्र्यांशी माझं बोलणं झालं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन केंद्राला कळवलं आहे. केंद्राकडून जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांमध्ये माणुसकी आहे का?

४८ तासांत कोकणात इतका पाऊस पडला आहे. राज्य सरकारला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. अतिवृष्टीमुळे कोकणातील लोकांची जीव धोक्यात येतो. राज्य सरकारकडून उपाययोजना होणं गरजेचे होते. मुख्यमंत्र्यांना माणुसकी आहे का? गाडी चालवत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले. परंतु चेंबूर, विक्रोळीला अतिवृष्टीनं घरं कोसळली, जे मृत पावलेले त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत? राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचा हित करणारा मुख्यमंत्री हवा. ड्रायव्हर शासनाकडे हजारो आहेत. गाडी चालवायची असेल तर कॅबिनेटला जा, मंत्रालयात जाऊन काम करा. राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती आहे. विकास ठप्प आहे अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर(CM Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.

कोकणात पुराचा हाहाकार

आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार तिलारी नदी धोका पातळीला पोचली असून कर्ली आणि वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 43.600 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 10 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 9.600 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

टॅग्स :Ratnagiri Floodरत्नागिरी पूरchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे