शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Flood: “तुमचे मंत्री बोटीत फिरत होते अन् आमचे मंत्री डायरेक्ट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्डवर उतरलेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 20:01 IST

Raigad Flood: 'राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

ठळक मुद्देमी सकाळी ७ वाजताच मंत्रालयात जाऊन कामाला लागायचो. हा राजकारणाचा विषय नाहीउद्धव ठाकरेंनी मंत्रालयात येऊन वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलले पाहिजेभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका, राष्ट्रवादीनं दिलं प्रत्युत्तर

मुंबई – महाराष्ट्रातील कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरानं थैमान घातलं आहे. रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर याठिकाणी नद्यांना आलेल्या पुरामुळे गावच्या गावं पाण्यात बुडाली आहेत. काही भागात दरडी कोसळल्याने आतापर्यंत ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदतीची घोषणा केली आहे. मात्र पुराच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

भाजपा नेते चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी उत्तर दिलं आहे. ट्विटरवर क्रास्टो यांनी म्हटलंय की, पूरग्रस्त भागात बोटीत बसून तुम्ही हात दाखूवन फोटो काढून असे निर्णय घेत होते. मात्र आमच्या महाविकास आघाडीच्या मंत्री आदिती तटकरे डायरेक्ट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्डवर उतरल्या आहेत. आठवणीसाठी तुमच्या सहकाऱ्यांनी टीपलेले छायाचित्रही पाहा असं म्हणत गिरीश महाजन यांचा बोटीतील फोटो अपलोड केला आहे.

मागच्या वेळच्या पुरात गिरीश महाजन पाहणी करण्यासाठी सांगली-कोल्हापूरला गेले होते तेव्हा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. अनेकांनी गिरीश महाजनांवर टीका केली होती.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

'राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताच्या सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. पावसामुळे अनेक इमारती पाण्यात गेल्या आहेत. मात्र आमचे मुख्यमंत्री मातोश्रीत बसले आहेत. ते वर्षा निवासस्थानीही नाहीत, त्यांना मंत्रालयात यायलाही वेळ नाही. मी सकाळी ७ वाजताच मंत्रालयात जाऊन कामाला लागायचो. हा राजकारणाचा विषय नाही, पण उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात येऊन वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलले पाहिजे. त्यांच्याकडून आढावा घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजेत. आम्ही सरकारला कधीही मदत करायला तयार आहोत असं त्यांनी सांगितले.

आम्ही थेट फिल्डवर जायचो

पाटील पुढे म्हणाले की, जेव्हा २०१९ साली राज्यात महापूर आला होता, तेव्हा १५ दिवस पाणी ओसरत नव्हतं. मी आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) थेट फिल्डमध्ये जायचो. हेलिकॉप्टर, बोटीच्या माध्यमातून आम्ही पोहचलो होतो. अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो. त्यावेळी आमच्यावर काँग्रेसकडून टीका केली जात होती. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली.

टॅग्स :floodपूरBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलAditi Tatkareअदिती तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस