शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Flood: “तुमचे मंत्री बोटीत फिरत होते अन् आमचे मंत्री डायरेक्ट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्डवर उतरलेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 20:01 IST

Raigad Flood: 'राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

ठळक मुद्देमी सकाळी ७ वाजताच मंत्रालयात जाऊन कामाला लागायचो. हा राजकारणाचा विषय नाहीउद्धव ठाकरेंनी मंत्रालयात येऊन वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलले पाहिजेभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका, राष्ट्रवादीनं दिलं प्रत्युत्तर

मुंबई – महाराष्ट्रातील कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरानं थैमान घातलं आहे. रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर याठिकाणी नद्यांना आलेल्या पुरामुळे गावच्या गावं पाण्यात बुडाली आहेत. काही भागात दरडी कोसळल्याने आतापर्यंत ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदतीची घोषणा केली आहे. मात्र पुराच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

भाजपा नेते चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी उत्तर दिलं आहे. ट्विटरवर क्रास्टो यांनी म्हटलंय की, पूरग्रस्त भागात बोटीत बसून तुम्ही हात दाखूवन फोटो काढून असे निर्णय घेत होते. मात्र आमच्या महाविकास आघाडीच्या मंत्री आदिती तटकरे डायरेक्ट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्डवर उतरल्या आहेत. आठवणीसाठी तुमच्या सहकाऱ्यांनी टीपलेले छायाचित्रही पाहा असं म्हणत गिरीश महाजन यांचा बोटीतील फोटो अपलोड केला आहे.

मागच्या वेळच्या पुरात गिरीश महाजन पाहणी करण्यासाठी सांगली-कोल्हापूरला गेले होते तेव्हा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. अनेकांनी गिरीश महाजनांवर टीका केली होती.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

'राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताच्या सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. पावसामुळे अनेक इमारती पाण्यात गेल्या आहेत. मात्र आमचे मुख्यमंत्री मातोश्रीत बसले आहेत. ते वर्षा निवासस्थानीही नाहीत, त्यांना मंत्रालयात यायलाही वेळ नाही. मी सकाळी ७ वाजताच मंत्रालयात जाऊन कामाला लागायचो. हा राजकारणाचा विषय नाही, पण उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात येऊन वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलले पाहिजे. त्यांच्याकडून आढावा घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजेत. आम्ही सरकारला कधीही मदत करायला तयार आहोत असं त्यांनी सांगितले.

आम्ही थेट फिल्डवर जायचो

पाटील पुढे म्हणाले की, जेव्हा २०१९ साली राज्यात महापूर आला होता, तेव्हा १५ दिवस पाणी ओसरत नव्हतं. मी आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) थेट फिल्डमध्ये जायचो. हेलिकॉप्टर, बोटीच्या माध्यमातून आम्ही पोहचलो होतो. अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो. त्यावेळी आमच्यावर काँग्रेसकडून टीका केली जात होती. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली.

टॅग्स :floodपूरBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलAditi Tatkareअदिती तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस