शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

बारा नावांची यादी हरवली, ती राज्यपालांकडे सापडली

By यदू जोशी | Updated: May 25, 2021 07:12 IST

Maharashtra POlitics News: राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती विधान परिषदेवर करण्यावरून सरकार विरुद्ध राजभवन यांच्यात बराच ताणतणाव आहे.

- यदु जोशीमुंंबई : ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं, तेच आम्हाला सापडलं’, अशाच धर्तीवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांसाठीची यादी हरवली, अशी चर्चा होत असतानाच ती यादी राज्यपालांकडे सुरक्षित असल्याची माहिती सोमवारी मिळाली. यादी कुठेही गेलेली नाही, असे राजभवनच्या अधिकृत सूत्रांनी लोकमतला सांगितले. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती विधान परिषदेवर करण्यावरून सरकार विरुद्ध राजभवन यांच्यात बराच ताणतणाव आहे. गेल्यावर्षी ६ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीतील नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनवर जावून १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविली होती. तेव्हापासून राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असून, अद्याप या यादीबाबत निर्णय का घेतला नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने २१ मे रोजी केली होती.त्यातच माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनीही १२ जणांची यादी राज्यपाल सचिवालयाकडे मागितली होती. मात्र, अशी यादी उपलब्ध नसल्याचे उत्तर सचिवालयाने दिले. त्याचा आधार घेत शिवसेनेच्या मुखपत्रात ‘१२ नावांची  यादी भुतांनी पळविली का’, असा खोचक प्रश्न करत त्याबाबतचे उत्तर आता राज्यपालांनीच द्यावे, असे म्हटले होते.या पार्श्वभूमीवर, राजभवनकडे विचारणा केली असता स्पष्ट करण्यात आले की, ही यादी राज्यपालांकडेच आहे. राज्याच्या तीन कॅबिनेट मंत्र्यांनी ती राजभवनवर येऊन राज्यपाल महोदयांकडे दिलेली होती, त्यामुळे ती उपलब्ध नसल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.सुत्रांनी सांगितले की, माहिती अधिकारात ही यादी मागण्यात आली होती. ती देता येणे गोपनीयतेच्या कारणाने राजभवनला शक्य नव्हते. महाविकास आघाडी सरकारकडून यादी देण्यात आली, तेव्हाही १२ जणांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नव्हती. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील विशिष्ट पत्रव्यवहार उघड न करण्याचा या दोन्ही घटनात्मक संस्थांना कायदेशीर अधिकार आहे. अशावेळी ‘ही यादी आमच्याकडे उपलब्ध नाही’ असे उत्तर देण्याऐवजी राजभवनने ‘सदर पत्रव्यवहार उघड करता येणार नाही’, असे उत्तर कायद्याचा आधार घेत दिले असते तर अधिक सुयोग्य ठरले असते, असे कायद्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी