शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

लोकसभा निवडणूक : यादी पाहिली आणि राहुल गांधी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 17:03 IST

 गांधी यांनी स्वत:च्या सुत्रांकडून राज्याच्या काही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य नावे तयार केली आहेत. प्रदेश शाखेकडून आलेल्या नावांमध्ये त्यांच्याकडची नावे नसल्याने त्यांनी खर्गे यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली.

 राजू इनामदार

पुणे:लोकसभेच्या राज्यातील मतदारसंघासाठी छाननी समितीने तयार केलेल्या यादीवरून काँग्रेस पक्षाध्यक्ष राहूल गांधी संतप्त झाले असल्याची चर्चा आहे. त्यांनी समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पक्षाच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर तसेच त्या-त्या मतदारसंघातील पदाधिकाºयांबरोबर थेट संपर्क करून नवी यादी तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडेही राहूल गांधी यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सुत्रांनी दिली. पुणे, यवतमाळ, सांगली अशा काही लोकसभा मतदारसंघांचा यात समावेश असल्याची चर्चा आहे.

             दिल्लीत सोमवारी राज्याच्या छाननी समितीची बैठक झाली. समिती सदस्य म्हणून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्य विधीमंडळ पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे या बैठकीला उपस्थित होते. खर्गे समितीचे अध्यक्ष व पक्षाने नियुक्त केलेले महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. त्या बैठकीत प्रदेश शाखेकडून आलेल्या नावांवर चर्चा झाली. त्यात राजीव सातव, सुशिलकुमार शिंदे, चारूशिला टोकस ही नावे त्यांंच्या मतदारसंघातून एकमेव असल्यामुळे ती केंद्रीय निवड समितीकडे पाठवण्यासाठी निश्चित झाली, पुणे, अहमदनगर (दक्षिण),यवतमाळ, मुंबई अशा काही मतदारसंघातून एकापेक्षा जास्त नावे आहेत. त्या जागांसाठी केंद्रीय संसदीय समितीकडे दिलेल्या नावांवरून राहूल गांधी संतप्त झाले असल्याचे बोलले जात आहे. 

           गांधी यांनी स्वत:च्या सुत्रांकडून राज्याच्या काही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य नावे तयार केली आहेत. प्रदेश शाखेकडून आलेल्या नावांमध्ये त्यांच्याकडची नावे नसल्याने त्यांनी खर्गे यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली. प्रदेश शाखने निश्चित केलेली नावेच यादीत आहेत असे खर्गे यांनी त्यांना सांगितले.त्यावेळी गांधी यांनी त्यांच्याकडे असलेल्या काही नावांचा उल्लेख करत प्रदेश शाखेच्या यादीत ही नावे का नाहीत अशी विचारणा केली असल्याची माहिती मिळाली. उल्हास पवार यांच्या पत्राचाही संदर्भ त्यांनी दिला असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. राज्य शाखेबरोबर पुन्हा बोला, स्थानिक पदाधिकाºयांशी चर्चा करा, त्यानंतर नवी यादी तयार करा असा आदेश राहूल यांनी खर्गेंना दिला. येत्या आठ दिवसांमध्ये ही सर्व प्रक्रिया करण्याबाबत त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या यादीत काही बदल होण्याची शक्यता वाढली आहे. पुण्यातील इच्छुक उमेदवारांच्या आशाही त्यामुले पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण