शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होऊ देणार नाही- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 17:46 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या आसाममध्ये सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून भाजपावर निशाणा साधला आहे.

आसामः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या आसाममध्ये सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून भाजपावर निशाणा साधला आहे. गोलाघाटमध्ये एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, नागरिकत्व विधेयक कधीही मंजूर होऊ देणार नाही. न्याय योजनेवरून मोदींनी केलेल्या टीकेलाही राहुल गांधींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.न्याय योजनेसाठी त्या चोरांच्या खिशातूनच पैसे येणार आहेत, ज्यांना मोदी वाचवत आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ईशान्य भारतावर हल्ला होऊ देणार नाही. एकीकडे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं मोदी सरकारनं खोटं आश्वासन दिलं, तर दुसरीकडे काँग्रेस पार्टीनं तुम्हाला  72 हजार रुपये देण्याचं खरं आश्वासन दिलं आहे. भारतातल्या 20 टक्के गरीब लोकांच्या खात्यात काँग्रेस पाच वर्षांत 3 लाख 60 हजार रुपये खात्रीशीररीत्या जमा करणार आहे. मोदींनी पाच वर्षांत कोट्यवधी लोकांना बेरोजगार केलं आहे.सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी मोठ-मोठी आश्वासनं दिली होती. परंतु त्यातील कोणतंही आश्वासन मोदींनी पूर्ण केलेलं आहे काय?, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याच्या आश्वासनाची अद्यापही पूर्ती केलेली नाही. आमचं सरकार सत्तेवर आल्यास महिन्याकाठी 12 हजारांहून कमी उत्पन्न असलेल्या लोकांची एक यादी तयार केली जाईल, त्या सर्वांच्या खात्यात काँग्रेस सरकार 72 हजार जमा करणार आहे. देशातील लाखो तरुण व्यवसाय सुरू करू इच्छितात. परंतु त्यासाठी सद्यस्थितीतील सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. परंतु आमचं सरकार आल्यावर कोणालाही व्यवसाय करायचा असल्यास परवानगी घेण्याची गरज लागणार नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसAssam Lok Sabha Election 2019 आसाम लोकसभा निवडणूक 2019