शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

येत्या लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर कोणीही टिकणार नाही, 2024ला पाहू- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 12:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूक 2019मध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत परतेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनीलोकसभा निवडणूक 2019मध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत परतेल, अशी आशा व्यक्त केली आहे. रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या निवडणुकीत एनडीए 300हून जास्त जागा जिंकून पुन्हा केंद्रात सत्ता स्थापन करेल. विरोधकांची गणितं सपशेल अपयशी ठरली आहेत. जनतेनं 30 वर्षांनंतर पूर्ण बहुमत असलेलं सरकार निवडलं आहे. जनतेला आता देश अस्थिरतेकडे घेऊन जायचा नाही. 2019च्या निवडणुकीत माझ्यासमोरही कोणीही टिकणार नाही.2024मध्ये माझ्याविरोधात कोणी मैदानात असल्यास ते तेव्हा पाहू, असंही मोदी म्हणाले आहेत. काँग्रेसनं निवडणुकीत तरुणांना आश्वासनं देऊन फसवलं आहे. नेहरूसुद्धा गरिबांबद्दल बोलायचे, इंदिराही गरिबीचा मुद्दा उचलायच्या, राजीव हेसुद्धा गरिबीबद्दल बोलायचे, आता त्यांची पाचवी पिढीसुद्धा गरिबीचा मुद्दा उचलत आहे, अशी टीका मोदींनी राहुल गांधींवर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग आणणारे, प्रसारमाध्यमांवर बंदी घालून त्यांची गळचेपी करणारे आणि आणीबाणी लावणाऱ्यांनी मला ज्ञान देण्याच्या भानगडीत पडू नये. महागठबंधनचं गणित थोड्याच दिवसांत कोलमडणार आहे. अर्ज भरल्यानंतर विरोधी पक्ष एकमेकांपासून आणखी विखुरले जातील. 2019मध्ये जेव्हा आमचं सरकार सत्तेवर येईल तेव्हा आम्ही विरोधी पक्षांनाही सोबत घेऊन जाऊ, असंही मोदी म्हणाले आहेत.  

मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''जे आपल्या देशाच्या पंतप्रधानावर संशय घेतात आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे कौतुक करतात, त्यांना ओळखले पाहिजे. जेव्हा अभिनंदन प्रकरण घडले तेव्हा देशातील सर्व राजकीय पक्षांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडणाऱ्या जवानाचा आम्हाला अभिमान आहे, असे एकजुटीने सांगण्याची गरज होती. मात्र ते सोडून या मंडळीने अभिनंदन परत कधी येईल, असा धोशा सुरू केला. त्या रात्री मेणबत्ती मोर्चा आणि पुलवामा हल्ल्याला राजकीय  मुद्दा बवण्याची योजनाही त्यांनी आखली होती. मात्र त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांचा डाव फसला.'' 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक