शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

येत्या लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर कोणीही टिकणार नाही, 2024ला पाहू- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 12:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूक 2019मध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत परतेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनीलोकसभा निवडणूक 2019मध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत परतेल, अशी आशा व्यक्त केली आहे. रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या निवडणुकीत एनडीए 300हून जास्त जागा जिंकून पुन्हा केंद्रात सत्ता स्थापन करेल. विरोधकांची गणितं सपशेल अपयशी ठरली आहेत. जनतेनं 30 वर्षांनंतर पूर्ण बहुमत असलेलं सरकार निवडलं आहे. जनतेला आता देश अस्थिरतेकडे घेऊन जायचा नाही. 2019च्या निवडणुकीत माझ्यासमोरही कोणीही टिकणार नाही.2024मध्ये माझ्याविरोधात कोणी मैदानात असल्यास ते तेव्हा पाहू, असंही मोदी म्हणाले आहेत. काँग्रेसनं निवडणुकीत तरुणांना आश्वासनं देऊन फसवलं आहे. नेहरूसुद्धा गरिबांबद्दल बोलायचे, इंदिराही गरिबीचा मुद्दा उचलायच्या, राजीव हेसुद्धा गरिबीबद्दल बोलायचे, आता त्यांची पाचवी पिढीसुद्धा गरिबीचा मुद्दा उचलत आहे, अशी टीका मोदींनी राहुल गांधींवर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग आणणारे, प्रसारमाध्यमांवर बंदी घालून त्यांची गळचेपी करणारे आणि आणीबाणी लावणाऱ्यांनी मला ज्ञान देण्याच्या भानगडीत पडू नये. महागठबंधनचं गणित थोड्याच दिवसांत कोलमडणार आहे. अर्ज भरल्यानंतर विरोधी पक्ष एकमेकांपासून आणखी विखुरले जातील. 2019मध्ये जेव्हा आमचं सरकार सत्तेवर येईल तेव्हा आम्ही विरोधी पक्षांनाही सोबत घेऊन जाऊ, असंही मोदी म्हणाले आहेत.  

मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''जे आपल्या देशाच्या पंतप्रधानावर संशय घेतात आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे कौतुक करतात, त्यांना ओळखले पाहिजे. जेव्हा अभिनंदन प्रकरण घडले तेव्हा देशातील सर्व राजकीय पक्षांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडणाऱ्या जवानाचा आम्हाला अभिमान आहे, असे एकजुटीने सांगण्याची गरज होती. मात्र ते सोडून या मंडळीने अभिनंदन परत कधी येईल, असा धोशा सुरू केला. त्या रात्री मेणबत्ती मोर्चा आणि पुलवामा हल्ल्याला राजकीय  मुद्दा बवण्याची योजनाही त्यांनी आखली होती. मात्र त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांचा डाव फसला.'' 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक