शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे- स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:56 IST

राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर इराणींचं शरसंधान

अमेठी: वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी निशाणा साधला. राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे अशा शब्दांमध्ये इराणींनी काँग्रेस अध्यक्षांवर टीका केली. राहुल गांधींनी आजपर्यंत कोणाला साथ दिली, असा प्रश्न विचारत एकेकाळचे त्यांचे साथीदार त्यांच्यापासून दुरावल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इराणी सध्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. राहुल यांनी आजपर्यंत कोणाला साथ दिली, असा प्रश्न अमेठीतील भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणींनी विचारला. 'महाआघाडीनं त्यांची साथ सोडली. ममताजी त्यांना महत्त्व देत नाहीत. डाव्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. ज्यांच्यासोबत त्यांनी सत्तासुख भोगलं, ते सर्वच आज राहुल गांधींपासून दूर गेले आहेत. राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे,' अशी घणाघाती टीका इराणींनी केली. राहुल गांधींनी आज केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावरुन इराणींनी राहुल यांना लक्ष्य केलं. राहुल यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरुन अमेठीतील जनतेचा अपमान केल्याचं त्यांनी म्हटलं. 'राहुल गांधी अमेठीत अपयशी ठरल्यानंतर आता वायनाडमधील जनतेला फसवण्यासाठी जात आहेत. त्यांना अमेठीचा विकास करता आला नाही. इथल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना कराला लागत आहे. आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना मदत दिली. मात्र राहुल यांनी 15 वर्षे शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही,' अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचा जाहीरनामा आणि त्यातील न्याय योजनेवरदेखील स्मृती इराणींनी तोंडसुख घेतलं. 'काँग्रेसला जाहीरनामा तयार करता येत नाही. राहुल गांधींची न्याय योजना गरिबांची फसवणूक आहे. अमेठीतील जनता यंदा भाजपाला मतदान करणार नाही. प्रियंका गांधींच्या राजकारणातील आगमनानं कोणताही फरक पडणार नाही. त्यांच्या प्रचारामुळे परिस्थितीत जराही बदल होणार नाही,' असंदेखील स्मृतींनी म्हटलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamethi-pcअमेठीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणी