शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे- स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:56 IST

राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर इराणींचं शरसंधान

अमेठी: वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी निशाणा साधला. राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे अशा शब्दांमध्ये इराणींनी काँग्रेस अध्यक्षांवर टीका केली. राहुल गांधींनी आजपर्यंत कोणाला साथ दिली, असा प्रश्न विचारत एकेकाळचे त्यांचे साथीदार त्यांच्यापासून दुरावल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इराणी सध्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. राहुल यांनी आजपर्यंत कोणाला साथ दिली, असा प्रश्न अमेठीतील भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणींनी विचारला. 'महाआघाडीनं त्यांची साथ सोडली. ममताजी त्यांना महत्त्व देत नाहीत. डाव्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. ज्यांच्यासोबत त्यांनी सत्तासुख भोगलं, ते सर्वच आज राहुल गांधींपासून दूर गेले आहेत. राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे,' अशी घणाघाती टीका इराणींनी केली. राहुल गांधींनी आज केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावरुन इराणींनी राहुल यांना लक्ष्य केलं. राहुल यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरुन अमेठीतील जनतेचा अपमान केल्याचं त्यांनी म्हटलं. 'राहुल गांधी अमेठीत अपयशी ठरल्यानंतर आता वायनाडमधील जनतेला फसवण्यासाठी जात आहेत. त्यांना अमेठीचा विकास करता आला नाही. इथल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना कराला लागत आहे. आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना मदत दिली. मात्र राहुल यांनी 15 वर्षे शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही,' अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचा जाहीरनामा आणि त्यातील न्याय योजनेवरदेखील स्मृती इराणींनी तोंडसुख घेतलं. 'काँग्रेसला जाहीरनामा तयार करता येत नाही. राहुल गांधींची न्याय योजना गरिबांची फसवणूक आहे. अमेठीतील जनता यंदा भाजपाला मतदान करणार नाही. प्रियंका गांधींच्या राजकारणातील आगमनानं कोणताही फरक पडणार नाही. त्यांच्या प्रचारामुळे परिस्थितीत जराही बदल होणार नाही,' असंदेखील स्मृतींनी म्हटलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamethi-pcअमेठीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणी