शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

विद्यमान पंतप्रधानांना शिव्या देणारे राजीव गांधींबद्दल बोलताच संतापतात- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 11:00 AM

राजीव गांधींबद्दलच्या विधानावर पंतप्रधान मोदी ठाम

नवी दिल्ली: माजी पंतप्रधानराजीव गांधींबद्दलच्या विधानावरुन काँग्रेसनंपंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. यावर भाष्य करताना आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. राजीव गांधींबद्दल मी केवळ तथ्य सांगितलं. त्यावरुन इतकं आकांडतांडव कशासाठी, असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला. ते 'नवभारत टाईम्स'शी बोलत होते. उत्तर प्रदेशात शनिवारी (4 मे) एका जनसभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली होती. त्यावेळी मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यांनी राजीव गांधींना भ्रष्टाचारी नंबर वन असं म्हटलं होतं. याबद्दल मोदींना मुलाखतीत प्रश्न विचारला. त्यावर मी केवळ तथ्य सांगितलं, असं उत्तर मोदींनी दिलं. 'मी केवळ माहिती दिली. मात्र त्यावरुन संपूर्ण काँग्रेस पक्षाला इतका राग का आला, ते मला समजत नाही. जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष एका विद्यमान पंतप्रधानाला शिव्या देतात, त्याच्या कुटुंबाची, गरिबीची टिंगल करतात, तेव्हा हाच काँग्रेस पक्ष टाळ्या वाजवत असतो,' अशा शब्दांमध्ये मोदींनी अप्रत्यक्षपणे 'चौकीदार चोर है'वर भाष्य केलं. काँग्रेस अध्यक्ष विद्यमान पंतप्रधानावर टीका करतात. मात्र त्यांच्या वडिलांबद्दल काही तथ्य सांगितल्यास त्यांचा संपूर्ण पक्ष संतापतो, असं मोदी म्हणाले. 'विशेष म्हणजे काँग्रेस पक्षातल्या कोणीही राजीव गांधी भ्रष्ट नव्हते किंवा मी चुकीचं तथ्य सांगितलं असं म्हटलेलं नाही. काँग्रेसनं दिल्लीत राजीव गांधींच्या नावावर निवडणूक लढवावी, असं आव्हान मी आधीही काँग्रेसला दिलं होतं आणि आता त्याचा पुनरुच्चार करतो,' अशा शब्दांमध्ये मोदी काँग्रेसवर बरसले. उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य करताना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींवरदेखील टीका केली. 'तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राजदरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती. मोदींच्या या टीकेला राहुल यांनी उत्तर दिलं होतं. 'मोदीजी, लढाई संपली आहे. तुमची कर्म तुमची वाट पाहत आहेत. माझ्या वडिलांवर आरोप करुन तुम्ही वाचू शकणार नाही,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीprime ministerपंतप्रधानRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेस