शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुस्लिमांबद्दलच्या विधानानं मेनका अडकल्या; भाजपाच्याच आयटी सेलवर भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 17:02 IST

वादग्रस्त विधानाबद्दल निवडणूक आगोगाची मेनका गांधींना नोटीस

सुलतानपूर: भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी मुस्लिम मतदारांबद्दल केलेल्या विधानानं वादात अडकल्या आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगानं नोटीस बजावल्यानंतर त्या स्वत:च्याच आयटी सेलवर भडकल्या. आमच्या आयटी सेलला काळजी घेण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. संतापलेल्या मेनका यांनी आयटी सेलची गरज आहे का, असा सवालदेखील उपस्थित केला. मी लिहिलेलं वाचून दाखवत नाही. मी जे काही बोलले, ते मनापासून बोलले, असं मेनका गांधींनी म्हटलं. 'मी भाषणं पाठ करून येत नाही. मी प्रचारसभेत त्यांच्याबद्दल (मुस्मिम मतदारांबद्दल) जे बोलले आणि वृत्तवाहिन्यांनी जे दाखवण्यात आलं, ते पूर्णपणे वेगळं होतं. मी अशी नाही. मुस्लिम बांधव आमच्यासोबत यावेत, यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्न करते आहे,' असं मेनका म्हणाल्या. या प्रकरणात आमच्या आयटी सेलनं काहीच केलं नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली. आयटी सेलनं ना माझं भाषण घेतलं ना काही केलं. त्यामुळे अशा आयटी सेलची खरंच गरज आहे का असा प्रश्न मला पाडतो, असा संताप मेनका गांधीनी व्यक्त केला. आयटी सेलवाले दिवसभर फोटो क्लिक करतात. ते फोटो अपलोड करतात. अशा पद्धतीनं निवडणूक होऊ शकत नाही, असं मेनका गांधी म्हणाल्या. मेनका गांधी मुस्लिमांना प्रचारादरम्यान उघडउघड धमकी देत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे त्या वादात सापडल्या. मी निवडणूक जिंकणारच आहे. त्यामुळे मला साथ द्या. अन्यथा उद्या माझ्याकडे एखादं काम घेऊन याल, तेव्हा मी काय करेन ते समजून जा, असं मेनका गांधी यांनी म्हटलं. सुलतानपूरमधील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्याबद्दल निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस पाठवली आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019sultanpur-pcसुल्तानपुरManeka Gandhiमनेका गांधीMuslimमुस्लीमBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग