शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का?- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 15:49 IST

काश्मीरमधील सुरक्षा दलांच्या कारवाईचा उल्लेख करत मोदींचा सवाल

लखनऊ: दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनसभेला संबोधित करताना विचारला. दहशतवादी बॉम्ब, बंदूक घेऊन समोर उभे असताना जवानांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन गोळ्या घालण्यासाठी परवानगी मागायची का, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. ते उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बोलत होते.लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातल्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशात आलेल्या मोदींनी जनसभेला संबोधित करताना आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात कारवाईचा संदर्भ दिला. आज सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. मोदींनी त्यांच्या भाषणात या कारवाईचा उल्लेख केला. 'काश्मीरमध्ये काही दहशतवादी मारले गेल्याचं आज सकाळीच समजलं. आता काही लोकांचा प्रश्न आहे की मतदान सुरू असताना मोदींनी दहशतवाद्यांना का मारलं. दहशतवाद्यांना मारण्याआधीही जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काश्मीरमध्ये सतत स्वच्छता अभियान सुरू असतं. दर दोन-तीन दिवसांनी स्वच्छता होत असते. हे स्वच्छता अभियान राबवणं माझं काम आहे, अशा शब्दांत मोदींनी दहशतवाद्यांवरील कारवाईचा उल्लेख केला. भगवान श्रीरामाचं नाव घेतल्यानं तुरुंगात टाकणाऱ्यांना लोकशाहीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचं आवाहन मोदींनी केलं. तुमचं मत माझ्यासाठी गरजेचं आहे. पवित्र आणि अमूल्य आहे, असं मोदी म्हणाले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019kushi-nagar-pcकुशी नगरNarendra Modiनरेंद्र मोदीterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग