शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

शिवसेनेनं स्वबळाचा नारा खरा 'करून दाखवला'; या राज्यात 'एकला चालो रे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 13:31 IST

15 लोकसभा मतदारसंघात शिवसेना स्वतंत्र लढणार

कोलकाता: भाजपा आणि शिवसेनेनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या गुजरातमधील रोड शोला उपस्थित राहणार आहेत. अमित शहा उद्या गांधीनगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करुन लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राज्यातील 48 जागांवर शिवसेना-भाजपानं युती केली असली, तरी पश्चिम बंगालमध्ये शिवसेना स्वबळ आजमावणार आहे. पश्चिम बंगालमधील 42 पैकी 15 जागांवर शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं 18 जागा लढवल्या होत्या. मात्र याआधी कधीही शिवसेनेनं पश्चिम बंगालमधून लोकसभा निवडणूक लढवलेली नाही. मात्र यंदा शिवसेनेनं कोलकाता दक्षिण, जादवपूर, बसिरहाट, बारासात, डमडम, बराकपूर, पुरालिया, बिष्णूपूर, मेदिनीपूर, कांठी, उत्तर माल्दा, बिरभूम आणि मुर्शिदाबाद या लोकसभेच्या जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व जागांवर हिंदू उमेदवारच दिले जाणार आहेत. राज्यातील भाजपा तृणमूलयुक्त असल्याचा टोला शिवसेनेचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष अशोक सरकार यांनी केला. 'शारदा, नारदा घोटाळ्यातील आरोपी असलेले तृणमूलचे नेते भाजपात दाखल झाले आहेत. मुकूल राय, संकूदेब पांडा यांची सीबीआयकडून चौकशीदेखील झाली आहे. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला,' असं सरकार म्हणाले.  भाजपा हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे सत्तेत आली. मात्र आता त्यांना त्याच विषयाचा विसर पडल्याची टीका सरकार यांनी केली. 'त्यांना आता हिंदुत्वाशी काहीही देणंघेणं नाही. त्यामुळे बंगालमध्ये आमचा लढा हिंदुत्व वाचवण्यासाठी आहे. यासाठी आम्ही राज्यात भाजपा आणि तृणमूलविरोधात लढणार आहोत,' असं सरकार म्हणाले. मोदी सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचं म्हणत ममता बॅनर्जींनी ग्रामीण भागात काही चांगली कामं केल्याचं सरकार यांनी सांगितलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv Senaशिवसेनाwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा