शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

'मोदी जिंकताहेत' ही तर विरोधकांची अफवा; विश्वास ठेवू नका- पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 13:40 IST

झारखंडमधील सभेत मोदींचं जनतेला आवाहन

रांची: देशातल्या 9 राज्यांमध्ये विधानसभेच्या 71 जागांसाठी मतदान सुरू आहे. एका बाजूला चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू असताना दुसऱ्या बाजूला पुढील टप्प्यांसाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या कोडरमामध्ये आले होते. तीन टप्प्यातल्या मतदानानंतर विरोधक भांबावून गेले आहेत. आता चौथ्या टप्प्यानंतर ते चारीमुंड्या चीत होतील, अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर तोफ डागली. विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना केलं. 'मोदी जिंकत आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करण्याची गरज नाही, असं विरोधक म्हणत आहेत. मात्र त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन मी करतो. मोदी जिंकत असतील, तर भरपूर मतदान करा आणि अधिकाधिक मतांनी त्यांना जिंकवा,' असं मोदी जनसभेला संबोधित करताना म्हणाले. याआधीही मोदींनी त्यांच्या सभेत अनेकदा अशा प्रकारे आवाहन केलं होतं. आम्ही निवडणूक जिंकत आहोत. मात्र प्रत्येक ठिकाणी कमळ उमलायला हवं. त्यामुळे नक्की मतदान करा. जेव्हा आमच्या सरकारनं भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली तेव्हा विरोधक चौकीदाराला चोर म्हणू लागले. विरोधकांचं मिशन महाभेसळ सुरू आहे. खिचडी सरकार स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. घोटाळे करता यावेत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असं मोदी म्हणाले. देशात खिचडी सरकार आल्यास देश मागे जाईल. त्यामुळे देशात सशक्त सरकार आणा, असं आवाहन मोदींनी केलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJharkhand Lok Sabha Election 2019झारखंड लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदी