शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

नशीब बलवत्तर होतं म्हणून वाचलो; अमित शहांची आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 12:34 IST

भाजपाच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अमित शहांची तृणमूलवर जोरदार टीका

नवी दिल्ली: भाजपा अध्यक्ष अमित शहांनी कोलकात्यातल्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन तृणमूल काँग्रेसवर शरसंधान साधलं. भाजपाच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसत असल्यानं हिंसाचाराचा आधार घेतला जात आहे. पण पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता नाही. राज्यातलं तृणमूल सरकार जनताच हटवेल, असं शहा म्हणाले. नशीब बलवत्तर होतं म्हणून काल मी वाचलो, अशा शब्दांत शहांनी आपबिती सांगितली. 'काल कोलकात्यात भाजपाचा रोड शो सुरू होण्याआधी तृणमूलच्या गुडांनी भाजपाचे पोस्टर फाडले. पण पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. भाजपाचा रोड शो सुरू होताच तृणमूलकडून हिंसाचार सुरू झाला. त्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान नसते, तर तिथून निघणं कठीण झालं असतं. तृणमूलच्या गुंडांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. माझं नशीब चांगलं असल्यानं मी तिथून योग्य वेळी निघालो,' असं शहा म्हणाले. संपूर्ण देशात निवडणूक झाली. पण केवळ पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार का झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही देशभरात निवडणूक लढवली. पण तिथे हिंसाचार झाला नाही. कारण तिथे तृणमूल नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. कारण केवळ याच राज्यात तृणमूल सत्तेत आहे, अशी टीका शहांनी केली. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनाही लक्ष्य केलं. दीदी, मी स्वत:ला देव समजत नाही. पण तुम्हीही समजू नका. कालच्या रॅलीत हिंसाचार झाला. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. पण हिंसाचाराचा जितका चिखल फेकाल, तितकं कमळ जोमानं फुलेल, हे दीदींनी लक्षात ठेवावं' असं शहा यांनी म्हटलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाBJPभाजपाtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जी