शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

नशीब बलवत्तर होतं म्हणून वाचलो; अमित शहांची आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 12:34 IST

भाजपाच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अमित शहांची तृणमूलवर जोरदार टीका

नवी दिल्ली: भाजपा अध्यक्ष अमित शहांनी कोलकात्यातल्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन तृणमूल काँग्रेसवर शरसंधान साधलं. भाजपाच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसत असल्यानं हिंसाचाराचा आधार घेतला जात आहे. पण पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता नाही. राज्यातलं तृणमूल सरकार जनताच हटवेल, असं शहा म्हणाले. नशीब बलवत्तर होतं म्हणून काल मी वाचलो, अशा शब्दांत शहांनी आपबिती सांगितली. 'काल कोलकात्यात भाजपाचा रोड शो सुरू होण्याआधी तृणमूलच्या गुडांनी भाजपाचे पोस्टर फाडले. पण पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. भाजपाचा रोड शो सुरू होताच तृणमूलकडून हिंसाचार सुरू झाला. त्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान नसते, तर तिथून निघणं कठीण झालं असतं. तृणमूलच्या गुंडांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. माझं नशीब चांगलं असल्यानं मी तिथून योग्य वेळी निघालो,' असं शहा म्हणाले. संपूर्ण देशात निवडणूक झाली. पण केवळ पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार का झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही देशभरात निवडणूक लढवली. पण तिथे हिंसाचार झाला नाही. कारण तिथे तृणमूल नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. कारण केवळ याच राज्यात तृणमूल सत्तेत आहे, अशी टीका शहांनी केली. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनाही लक्ष्य केलं. दीदी, मी स्वत:ला देव समजत नाही. पण तुम्हीही समजू नका. कालच्या रॅलीत हिंसाचार झाला. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. पण हिंसाचाराचा जितका चिखल फेकाल, तितकं कमळ जोमानं फुलेल, हे दीदींनी लक्षात ठेवावं' असं शहा यांनी म्हटलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाBJPभाजपाtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जी