शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
4
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
5
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
6
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
7
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
8
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
9
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
10
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
11
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
12
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
14
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
15
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
16
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
17
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
18
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
19
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
20
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत

मुख्यमंत्री राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढू शकतात?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 17:29 IST

जाती-धर्माच्या आधारावर मतं मागणं, पैशाचा वापर करणं, आमिष दाखवून मतं मिळवणं हे अवैध आहे.

ठळक मुद्देराज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून घेता येईल का, यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याचा आरोप अभिजीत पानसे यांनी केला.जाती-धर्माच्या आधारावर मतं मागणं, पैशाचा वापर करणं, आमिष दाखवून मतं मिळवणं हे अवैध आहे. राज ठाकरेही कुणा एका ठरावीक उमेदवारासाठी प्रचार करत नाही आहेत.

'ए लाव रे तो व्हिडीओ' हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात परवलीचं वाक्यच झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर 'व्हिडीओ स्ट्राईक' करत आहेत. या हल्ल्याला भाजपाकडे प्रत्युत्तर नाही, ते घाबरलेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यांना पराभव दिसू लागलाय, असे दावे राजसमर्थक, मनसैनिक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मनसे नेते अभिजीत पानसे यांनी पुण्यातील सभेत गंभीर आरोप केला. राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून घेता येईल का, यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याचं सांगत त्यांनी खळबळ उडवून दिली. त्यांच्या या दाव्यासंदर्भात कायदेतज्ज्ञांचं मत घेतलं असता, हे अगदीच निराधार आणि हास्यास्पद विधान असल्याचं त्यांनी सांगितलं. कारण, एखाद्या व्यक्तीचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाहीच, तो केवळ राष्ट्रपतींना आहे आणि त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया आहे. तसंच, राज ठाकरे स्वत: उमेदवार नसल्यानं आणि त्यांचा पक्षाचाही कुणी उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्यानं त्यांच्यावर ही कारवाई होण्याची अजिबातच शक्यता नाही, अशी माहिती जाणकारांनी दिली.

देशातील विविध निवडणुका कशा घ्यायच्या, त्याची नियमावली-निकष काय, याबद्दलची सविस्तर मांडणी १९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये करण्यात आली आहे. याच कायद्यातील कलमान्वये निवडणूक घेण्याचे सर्वाधिकार निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. त्यानुसारच, देशाची निवडणूक असो किंवा राज्यांची; ती कधी घ्यायची हे ठरवण्यापासून निकालांपर्यंत सर्व जबाबदारी आयोगाकडे असते. उमेदवारांसाठी, राजकीय पक्षांसाठी असलेल्या आचारसंहितेचं पालन होतंय की नाही, याकडेही निवडणूक आयोगाचं लक्ष असतं. गेल्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाने दिलेले आदेश, कारवाया पाहिल्यास हे सहज स्पष्ट होईल. 

निवडणूक निकाल लागल्यावरही आयोगाचं काम संपत नाही. कारण, विजयी झालेल्या एखाद्या उमेदवाराविरोधात कुणी तक्रार केली, तर त्याची नोंद आयोगाला घ्यावी लागते, चौकशी करावी लागते. जाती-धर्माच्या आधारावर मतं मागणं, पैशाचा वापर करणं, आमिष दाखवून मतं मिळवणं हे अवैध आहे. हे मार्ग वापरून कुणी विजयी झाला असेल, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. आरोप सिद्ध झाल्यास, ती निवडणूक रद्द होतेच, पण संबंधित उमेदवार ठरावीक काळासाठी निवडणूक लढवण्यास अपात्रही ठरवला जाऊ शकतो. अशा कारवाईचं एक उदाहरण म्हणजे, रमेश प्रभू आणि त्यांच्यासाठी प्रचार केलेले शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे. 

डिसेंबर १९८७ मध्ये मुंबईत विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत रमेश प्रभू (मुंबईचे माजी महापौर) अपक्ष म्हणून उभे राहिले होते. बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता आणि त्यांच्यासाठी प्रचारसभाही घेतल्या होत्या. या निवडणुकीत रमेश प्रभू विजयी झाल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रभाकर कुंटे यांनी कोर्टात धाव घेतली होती. प्रभू आणि बाळासाहेबांनी धर्माच्या आधारावर मतं मागितल्याचा आरोप त्यांनी केला होता. 'आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी ही निवडणूक लढत आहोत. आम्हाला मुस्लीम मतांची पर्वा नाही. हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार', असं विधान बाळासाहेबांनी एका सभेत केलं होतं. तो आचारसंहितेचा भंग असल्याचा शिक्का उच्च न्यायालयानं मारला. त्यानंतर, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर राष्ट्रपतींकडे गेलं होतं. त्यावेळी राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाच्या मदतीनेच या प्रकरणी निकाल दिला होता. रमेश प्रभू आणि बाळासाहेब ठाकरे यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवता येणार नाही आणि मतदान करता येणार नाही, असा आदेश राष्ट्रपतींनी १९९९ मध्ये दिला होता. १९८७ साली घडलेलं प्रकरण एका तपानंतर निकाली निघालं होतं. १९९०च्या निवडणुकीनंतर अशीच कारवाई सुभाष देसाईंवरही करण्यात आली होती.

हे उदाहरण पाहता, राज ठाकरेंवर मतदान बंदीची कारवाई का शक्य नाही हे सहज लक्षात येतं. मुळात मनसेचा स्वतःचा, मनसे पुरस्कृत कुणीही उमेदवार निवडणूक लढवत नाहीए. राज ठाकरेही कुणा एका ठरावीक उमेदवारासाठी प्रचार करत नाही आहेत. ते जे बोलत आहेत, ते आचारसंहितेचा भंग करणारंही नाही. समजा, हे सगळं असतं तरी त्यांच्यावर मतदान बंदीएवढी मोठी कारवाई करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नव्हताच. त्यामुळे पानसे यांचा आरोप उगाचच खळबळ उडवण्यासाठी होता, असंच म्हणावं लागेल. राज यांना भाजपा किती घाबरलंय, हे दाखवण्याची खेळी म्हणूनच त्याकडे पाहावं असं कायदेतज्ज्ञांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019pune-pcपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस