नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आयएनएस विराटचा वापर टॅक्सीसारखा केला, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानामुळे भाजपा-काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. राजीव गांधींनी सुट्टीसाठी आयएनएस विराटचा वापर केला, असा दावा करणाऱ्या मोदींना आता काँग्रेसचा सोशल मीडिया विभाग सांभाळणाऱ्या दिव्या स्पंदना यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अभिनेता अक्षय कुमारचे आयएनएस सुमित्रावरील फोटो ट्विट करत कॅनडाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान मोदी आयएनएस सुमित्रावर घेऊन गेले होते. ते कसं काय चाललं, असा सवाल स्पंदना यांनी उपस्थित केला. यासोबतच त्यांनी सबसे बडा झूठा मोदी, असा हॅशटॅग वापरला आहे.
कॅनडाच्या नागरिकाला युद्धनौकेवर घेऊन जाता, ते कसं चालतं; काँग्रेसचा मोदींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 09:15 IST