शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

मोदीजी, राजीव गांधींसोबत राफेलवरही बोला; राहुल गांधींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 15:36 IST

मोदींच्या राजीव गांधींवरील टीकेला राहुल गांधींचं प्रत्युत्तर

सिरसा: माजी पंतप्रधान राजीव गांधींवर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'तुम्हाला माझ्याबद्दल बोलायचं आहे. राजीव गांधींबद्दल बोलायचं आहे. अगदी बिनधास्त बोला. पण राफेल प्रकरणात काय झालं, काय नाही झालं हेदेखील जनतेला सांगा,' असं आव्हान राहुल गांधींनी मोदींना दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी वारंवार राजीव गांधींवर टीका करत आहेत. या टीकेचा राहुल यांनी आज सिरसातल्या जनसभेत समाचार घेतला. 'तुम्हाला माझ्याबद्दल, माझ्या वडिलांबद्दल जे काही बोलायचं आहे, ते बोला. पण 2 कोटी रोजगारांवरही बोला. तुम्ही दिलेल्या 2 कोटी रोजगारांच्या आश्वासनाचं काय झालं, ते देशातल्या तरुणांना सांगा,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींवर पलटवार केला. यावेळी त्यांनी अनिल अंबानी आणि देशाबाहेर पळून गेलेल्या उद्योगपतींवरुन मोदींना लक्ष्य केलं. 'पंतप्रधान मोदी केवळ अनिल अंबानी, नीरव मोदींसारख्या 15 उद्योगपतींचं कर्ज माफ करतात. ते फक्त त्यांच्यासाठीच काम करतात. त्यांना गरिबांशी काहीही देणंघेणं नाही,' अशी टीका राहुल यांनी केली. तुम्ही तुमच्या श्रीमंत मित्रांना पैसे वाटा. मी गरिबांमध्ये पैसे वाटतो, असंदेखील ते पुढे म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी न्याय योजनेचा उल्लेख केला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मोदींनी 15 लाख रुपये देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. मात्र मोदी देशवासीयांशी खोटं बोलले. मी 15 लाख देऊ शकत नाही. पण 3 लाख 60 हजार देऊ शकतो आणि हे माझं वचन आहे, असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प असेल, या आश्वासनाचाही त्यांना पुनरुच्चार केला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHaryana Lok Sabha Election 2019हरियाना लोकसभा निवडणूक 2019sirsa-pcसरसाNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीRahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डील