शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

Raj Thackeray: ...अन् अजित डोवालांवर केलेला 'स्ट्राईक' राज ठाकरेंवरच उलटला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 16:10 IST

राज ठाकरेंनी पुलवामा हल्ल्याच्या संशयाची सुई अजित डोवाल यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने गंभीर आरोप केलेत. हा हल्ला घडवून तर आणला नाही ना, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापुरातील सभेत पहिल्यांदा त्यांनी ही शंका घेतली होती आणि थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे संशयाची सुई वळवण्याचा प्रयत्न केला होता. पुलवामामधील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत, अजित डोवाल या माणसाची चौकशी केल्यास सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली होती. परंतु, भाजपाने आज राज यांचीच सुई त्यांनाच टोचल्याचं पाहायला मिळालं.  

'२७ डिसेंबरला अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची थायलंडमध्ये भेट झाली होती. या बैठकीत काय झालं हे आम्ही विचारायला नको का? या भेटीनंतर एक-दीड महिन्यातच देशात युद्धसदृश परिस्थिती कशी निर्माण झाली? या भेटीत काय झालं, काय घडलं, बोलणी यशस्वी झाली की फिस्कटली?', असे प्रश्न करत राज ठाकरेंनी डोवाल यांना जवळपास आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं करण्याचा प्रयत्न केला होता. एका वेबसाईटची बातमी स्क्रीनवर दाखवत त्यांनी हा 'स्ट्राईक' केला होता. पण तो त्यांच्यावरच उलटला. कारण, ही भेट २०१८च्या नव्हे, तर २०१७च्या डिसेंबर महिन्यात २७ तारखेला झाली होती. राज यांनी जी बातमी स्क्रीनवर दाखवली, त्या बातमीची खरी तारीख दाखवत आज भाजपाने राज यांना खोटं पाडलं. 

 अजित डोवाल आणि नासेर खान जंजुआ यांच्यातील चर्चेचा मुख्य विषय नियंत्रण रेषेवरील घुसखोरी हा होता. तसंच, हेरगिरीच्या संशयावरून पाकिस्ताननं ताब्यात घेतलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासंबंधीही या बैठकीत चर्चा झाली होती, याकडे मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी लक्ष वेधलं. या भेटीनंतर तब्बल १४ महिन्यांनी पुलवामा इथे दुर्दैवी हल्ला झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

सुषमा स्वराजांची बातमी अन् व्हिडीओ 

बालाकोट इथल्या एअर स्ट्राईकसंदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या एका विधानावरून राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या एकाही नागरिकाचा किंवा सैनिकाचा मृत्यू झाला नसल्याचं स्वराज म्हणाल्या होत्या. त्या संदर्भातील बातमीचं कात्रण दाखवत, स्ट्राईकमध्ये कुणीही मेलेलं नाही, असं केंद्रीय मंत्रीच म्हणत असल्याचं राज म्हणाले होते. त्यावर, भाजपाने आज स्वराज यांच्या संपूर्ण विधानाचा व्हिडीओ दाखवला. दहशतवाद्यांनाच लक्ष्य करण्याचं वायुसेनेनं ठरवलं होतं आणि त्यांनी आपलं काम फत्ते केलं, एकाही पाकिस्तानी नागरिकाचा किंवा सैनिकाचा मृत्यू झालेला नाही, असं त्यांचं वाक्य होतं. ते ऐकवून भाजपाने राज यांनी कोंडी केली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाAjit Dovalअजित डोवाल