शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

अनेक मतदारांची नावं मतदारयादीतून काढली, केजरीवालांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 1:59 PM

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 91 जागांवर आज मतदान होत आहे.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 91 जागांवर आज मतदान होत आहे. त्याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या निष्पक्षपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अरविंद केजरीवालांनी अनेक युजर्सच्या ट्विटला रिट्विट करत निवडणूक निष्पक्षपणे होते आहे काय, असा प्रश्न विचारला आहे.केजरीवालांनी बायोकॉनची संस्थापक किरण मुजुमदार शॉ यांच्या ट्विटला रिट्वट करत सांगितलं की, भारतातल्या अनेक लोकांची नावं मतदारयादीतून काढण्यात आली आहेत, असा एक रिपोर्ट समोर आला आहे. सर्वच खराब ईव्हीएम मशिनमध्ये केलेलं मतदान हे भाजपाला जात असल्याचा आरोपही दुसऱ्या एका ट्विटला रिट्विट करत केजरीवालांनी केला आहे. ज्यांची नावं मतदारयादीतून काढण्यात आली आहेत, ते भाजपाचे विरोधक आहेत. सोशल मीडियावरही अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत.अनेकांची नावं मतदारयादीत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. केजरीवालांनी त्या तक्रारींच्या आधारे निवडणुकीत फसवणूक होत असल्याचा आरोप केला आहे. आज देशातील 20 राज्यांमधील 91 जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. तसेच इतर चार राज्यांमध्येही विधानसभेच्या जागांसाठीही मतदान सुरू आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNew Delhiनवी दिल्लीBJPभाजपाAAPआप