शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

बिहारमध्ये NDAत उभी फूट, लोकजनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे लढवणार निवडणूक

By बाळकृष्ण परब | Updated: October 4, 2020 18:11 IST

Bihar Assembly Election 2020 Marathi News : लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देलोकजनशक्ती पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची केली घोषणा लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याबाबतचा घेण्यात आला निर्णय मात्र राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि लोकजनशक्ती पार्टीची आघाडी मजबूत असेल

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी एनडीएमध्ये उभी फूट पडली आहे. सुरुवातीपासूनच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला विरोध करणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय बोर्डाची बैठक चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झाली. या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक न लढवण्याचा आणि लोजपा भाजपा सरकारचा प्रस्ताव पारित कण्यात आला. लोजपाचे सर्व आमदार मोदींचे हात बळकट करतील, असे ठरवण्यात आले.याबाबत लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस अब्दुल खालिक यांनी बैठकीबाबत माहिती देताना सांगितले की, वैचारिक मतभेदांमुळे लोकजनशक्ती पार्टी जनता दल युनायटेडसोबत बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. मात्र राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि लोकजनशक्ती पार्टीची आघाडी मजबूत असेल.अब्दुल खालिक यांनी सांगितले की, बिहार विधासभेच्या काही जागांवर लोकजनशक्ती पार्टीची जेडीयूसोबत वैचारिक लडाई होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे त्या जागांवर जनतेला कुठला उमेदवार हा बिहारच्या हिताबाबत उपयुक्त आहे याची निवड करता येईल. दरम्यान, लोकजनशक्ती पार्टी बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट व्हिडन डॉक्युमेंट लागू करण्याच्या विचारात होती. मात्र त्यावर एकमत होऊ शकले नाही. केंद्राप्रमाणेच बिहारमध्येसुद्धा भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार बनावे, अशी लोकजनशक्ती पार्टीची इच्छा आहे. आता लोकजनशक्ती पार्टीचा प्रत्येक आमदार भाजपाच्या नेतृत्वाखाली बिहारला फर्स्ट बनवण्यासाठी प्रयत्न करेल, अशी घोषणा लोकजनशक्ती पार्टीने केली आहे.तेजस्वी यादव करणार महाआघाडीचं नेतृत्त्वदरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीने शनिवारी जागा वाटप जाहीर केले. सर्व पक्षांनी तेजस्वी यादव यांना आघाडीचे नेते म्हणून समर्थन दिले. या आघाडीत २४३ सदस्यीय विधानसभेत राजद १४४, काँग्रेस ७० जागा लढविणार आहे. माकपा ६, भाकपा ४ आणि भाकपा (माले) यांना १९ जागा देण्यात आल्या आहेत.या जागावाटपाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच व्हीआयपी पार्टीचे नेते मुकेश सहनी यांनी आपल्या पक्षाला जागा न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि महाआघाडीतून वेगळे होत असल्याची घोषणा केली. राजदने आम्हाला धोका दिला, असा आरोपही त्यांनी केला होता.तेजस्वी यादव म्हणाले की, जनादेशाचा अपमान करणाऱ्यांना लोक धडा शिकवतील. दहा लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आघाडीत झालेल्या चर्चेनुसार वाल्मिकीनगर लोकसभा जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार उभा करणार आहे. २०१५ मध्ये राजद, काँग्रेस आणि जदयू यांनी एकत्र निवडणूक लढविली होती. मात्र, नंतर नितीशकुमार यांनी भाजपसोबत युती केली.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBJPभाजपाPoliticsराजकारण