शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
2
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
3
अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?
4
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
5
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
6
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
7
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
8
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
9
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
10
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?
11
ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती
12
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
13
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
14
गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!
15
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
16
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
17
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
18
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
19
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
20
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत

कोलकात्यात डावी आघाडी, काँग्रेसचे आज शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 6:20 AM

विधानसभा निवडणूक, तृणमूल, भाजपला देणार आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्ककोलकाता : विधानसभेच्या निवडणुकांसाठी समझोता झालेल्या पक्ष व काँग्रेस यांच्या आघाडीने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर लगेचच शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. त्यांची संयुक्त सभा उद्या, रविवारी येथील ब्रिगेड परेड मैदानावर होणार असून, त्याद्वारे आपली ताकद दाखविण्याचे या पक्षांनी ठरविले आहे. 

  या आघाडीत इंडियन सेक्युलर फ्रंटही सहभागी होणार असून, रविवारच्या सभेला एक लाखांहून अधिक लोक हजर राहतील, असा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.    सलग ३० वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीचा दहा वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पराभव केला. तेव्हापासून माकप, भाकप, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक या डाव्या पक्षांची ताकद कमी होत गेली.  गेल्या निवडणुकीत २९४ पैकी २०९ जागांवर तृणमूल काँग्रेस विजयी झाली. डावे पक्ष व काँग्रेस यांना मिळून ७५ जागा मिळाल्या, पण पुढे आघाडी फुटली आणि दोन्ही पक्षांच्या काही आमदारांनीही पक्षांतर केले. अलीकडे पक्षांतराची लागण तृणमूललाही लागली आणि त्या पक्षाच्या अनेक आमदारांनी राजीनामा देत भाजपची वाट धरली.

ममता यांना मात्र खात्रीमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मात्र बहुमत मिळण्याची खात्री वाढत आहे. भाजपने कितीही जोर लावला  तरी त्या पक्षाला बहुमत मिळू शकणार नाही, असे त्या पक्षाचे नेते सांगत आहेत. निवडणूक नीतीतज्ज्ञ व ममता बॅनर्जी यांचे सल्लागार प्रशांत किशोर यांनी तर ममताच मुख्यमंत्री होतील, असे आपण आताच लिहून देतो, तसे होते की नाही ते निकालाच्या दिवशी पाहा, असे म्हटले आहे.

दोन तृतीयांश बहुमत मिळवून भाजपचे डावपेच उधळून लावूराहुल गांधी, काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहनतुतीकोरिन : अन्य पक्षांचे आमदार फोडून स्वत:चे सरकार स्थापन करणे, असा लोकशाहीला मारक प्रयोग भाजपने सुरू केला आहे. पुदुच्चेरी हे त्याचे ताजे उदाहरण आहे. भाजपचे हे डावपेच उधळून लावण्यासाठी काँग्रेसने केवळ साधे बहुमत मिळवून चालणार नाही. विधानसभा निवडणुकांत दोन तृतीयांश बहुमत मिळाले, तरच भाजपची कारस्थाने थांबविता येतील, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केले. ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेश, गोवा, मध्यप्रदेश येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे  भाजपने आपले आमदार फोडले, सरकारे स्थापन केली. राजस्थानातही आपले आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. झारखंडमध्येही सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनीकोणत्याही राज्यात आपल्याला व सहकारी पक्षाला काठावरील बहुमत मिळवण्यात आनंद मानू नये आणि  दोन तृतीयांश बहुमत मिळविण्यासाठी कामाला लागावे. ते झाले, तरच भाजपचा घोडेबाजार थांबविता येईल. राहुल गांधी केरळ, तामिळनाडू व पुदुच्चेरी दौऱ्यावर असून, या तिन्ही ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१