शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बंडखोरीची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 07:49 IST

पक्ष दुबळा होण्यास व पक्षाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होण्यास नवे नेतृत्व कारणीभूत असल्याची टीका राहुल गांधी यांचे नाव न घेता करण्यात आली. कार्यकर्ते हताश झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजम्मू / नवी दिल्ली : दिवसेंदिवस काँग्रेस पक्ष दुबळा होत असून, त्यात ताबडतोब बदल करण्याची गरज आहे आणि त्यासाठी गुलाम नबी आझाद यांची पक्षाने मदत घ्यायलाच हवी, असे उघड आवाहन काँग्रेस नेते कपिल सिबल यांनी केले. त्यांचे हे आवाहन म्हणजे पक्ष नेतृत्वाविरोधात केलेले बंडच मानले जात आहे. गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मूमध्ये झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात राज बब्बर, आनंद शर्मा, मनीष तिवारी, भूपिंदर हुड्डा, विवेक तनखा यांनीही आझाद यांच्या समर्थनार्थ भाषणे केली. त्या सर्वांचा सूर पक्ष नेतृत्वात बदल होणे गरजेचे आहे, असाच होता. स्वत: आझाद यांनीही आपण राज्यसभेतून निवृत्त झालो असलो तरी राजकारणातून बाहेर गेलेलो नाही, असे सांगून एका प्रकारे पक्ष नेतृत्वाला आव्हानच दिले.

पक्ष दुबळा होण्यास व पक्षाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होण्यास नवे नेतृत्व कारणीभूत असल्याची टीका राहुल गांधी यांचे नाव न घेता करण्यात आली. कार्यकर्ते हताश झाले आहेत. त्यामुळे आपल्याला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राज बब्बर यांनी केले.

काँग्रेसमध्ये वेगळी भूमिका मांडणाऱ्या नेत्यांचा जो गट जी-२३ नावाने ओळखला जातो, त्यातील हे सर्व नेते आहेत. या नेत्यांनी पक्षात सुधारणा घडवून आणण्यासाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मेळावे घेण्याची भाषा केली. जम्मूनंतर ते आता पंजाबमध्ये मेळावा घेणार आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेस