शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बंडखोरीची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 07:49 IST

पक्ष दुबळा होण्यास व पक्षाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होण्यास नवे नेतृत्व कारणीभूत असल्याची टीका राहुल गांधी यांचे नाव न घेता करण्यात आली. कार्यकर्ते हताश झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजम्मू / नवी दिल्ली : दिवसेंदिवस काँग्रेस पक्ष दुबळा होत असून, त्यात ताबडतोब बदल करण्याची गरज आहे आणि त्यासाठी गुलाम नबी आझाद यांची पक्षाने मदत घ्यायलाच हवी, असे उघड आवाहन काँग्रेस नेते कपिल सिबल यांनी केले. त्यांचे हे आवाहन म्हणजे पक्ष नेतृत्वाविरोधात केलेले बंडच मानले जात आहे. गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मूमध्ये झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात राज बब्बर, आनंद शर्मा, मनीष तिवारी, भूपिंदर हुड्डा, विवेक तनखा यांनीही आझाद यांच्या समर्थनार्थ भाषणे केली. त्या सर्वांचा सूर पक्ष नेतृत्वात बदल होणे गरजेचे आहे, असाच होता. स्वत: आझाद यांनीही आपण राज्यसभेतून निवृत्त झालो असलो तरी राजकारणातून बाहेर गेलेलो नाही, असे सांगून एका प्रकारे पक्ष नेतृत्वाला आव्हानच दिले.

पक्ष दुबळा होण्यास व पक्षाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होण्यास नवे नेतृत्व कारणीभूत असल्याची टीका राहुल गांधी यांचे नाव न घेता करण्यात आली. कार्यकर्ते हताश झाले आहेत. त्यामुळे आपल्याला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राज बब्बर यांनी केले.

काँग्रेसमध्ये वेगळी भूमिका मांडणाऱ्या नेत्यांचा जो गट जी-२३ नावाने ओळखला जातो, त्यातील हे सर्व नेते आहेत. या नेत्यांनी पक्षात सुधारणा घडवून आणण्यासाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मेळावे घेण्याची भाषा केली. जम्मूनंतर ते आता पंजाबमध्ये मेळावा घेणार आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेस