शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

कोकणच्या मातीचे ऋण विकासाच्या रूपाने फेडायचे आहे - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:02 AM

रायगड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कर्तृत्ववान खासदारांची गरज आहे.

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कर्तृत्ववान खासदारांची गरज आहे. केंद्रातील निधीचा वापर कसा करावा, याची जाण विद्यमान खासदारांना नाही. मला कोकणच्या मातीचे ऋण विकासाच्या रूपाने फेडायचे आहेत. श्रीवर्धनचा आमदार या नात्याने विकासकामे करण्याचे भाग्य मला लाभले. आता खासदार म्हणून काम करण्याची संधी द्या. रायगड जिल्ह्याचे पर्यटन जगाच्या नकाशावर दिसेल, असे वक्तव्य आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी के ले.श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित प्रचारसभेत ते बालत होते. श्रीवर्धनमधील कसबापेठेतील चौकसभेत त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व मतदार यांना संबोधित केले. जनतेचा प्रतिनिधी या नात्याने मला विकासाची गंगा दिल्लीवरून रायगडपर्यंत आणायची आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची विकासकामे मी श्रीवर्धनचा आमदार या नात्याने केली आहेत. श्रीवर्धनचा कायापालट करण्याचे भाग्य मला लाभले आहे. भविष्यात विविध समाजोपयोगी विकासकामांना मी चालना देणार आहे. गेली पाच वर्षे सत्तेत नसतानासुद्धा विकास निधींची कमतरता मी कधीच भासू दिली नाही. आज रायगड जिल्ह्यातील जनता विकासाच्या पाठीशी उभी आहे, याचा मला विश्वास आहे. बॅरिस्टर अंतुले हे माझे मार्गदर्शक होते. त्यांनी कोकणाच्या विकासाला चालना दिली. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी अर्थमंत्री असताना सर्वात मोठे पॅकेज कोकणाच्या जनतेसाठी दिले. त्या वेळी विरोधातील पक्षाने हा कोकणचा अर्थसंकल्प आहे असे बोलत माझ्यावर टीका केली. मला कोकणच्या मातीचे ऋण विकासरूपी कर्तुत्वाने फेडायचे आहे, असे तटकरे यांनी सांगितले.

अनंत गीते यांच्या प्रचारसभेतील त्यांच्या भाषाशैलीची संभावना करताना तटकरे यांनी सांगितले, मला यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांचा वैचारिक वारसा लाभला आहे ते संस्कार आमच्यावर आहेत. त्यामुळे माझी सापाशी केलेली तुलना ही असंस्कृतपणाचे द्योतक आहे. या वर्षीची लढाई ही निष्क्रियतेविरुद्ध विकास अशी करायची आहे. अनंत गीते रायगडच्या जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयशी झाले आहेत. त्यांच्या निष्क्रियतेमुळे जनता कंटाळली आहे.
राजकारणात वारसदार हा रक्ताने नव्हे तर विचारांच्या अथांगतेतून कर्तृत्व सिद्धीद्वारे ठरवला जातो, असे तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे नावीद अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भात भाष्य केले. तालुक्यातील मुस्लीम समाज माझ्या पाठीशी उभा आहे. मी धर्मनिरपेक्ष विचारांचा पाईक आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे. आपला विकास साधावा, विकासातून प्रगतीची दारे सर्वांसाठी खुली व्हावीत त्यासाठी मला खासदार म्हणून संधी द्या. आगामी काळात जिल्ह्याचा चेहरामोहोरा विकासकामाद्वारे बदलण्याची जबाबदारी माझी आहे, असे तटकरे म्हणाले. यावेळी जितेंद्र सातनाक, नरेंद्र भुसाने आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड