शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

कपिल पाटील यांनी स्वीकारली पंचायत राज राज्यमंत्रिपदाची सूत्रे; केला तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत योजना पोचविण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 18:41 IST

Kapil Patil News: केंद्रीय राज्यमंत्रीपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन प्रशासनातील कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती.

- नितिन पंडीतभिवंडी, ( दि. १२ )  केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्रीपदाची सूत्रे सोमवारी स्वीकारली. तसेच देशभरातील तळागाळातील व दुर्गम भागातील ग्रामस्थांपर्यंत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना पोचविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

केंद्रीय राज्यमंत्रीपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन प्रशासनातील कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पंचायत राज मंत्रालयात पाटील यांनी सोमवारी राज्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी मुरबाडचे आमदार किसन कथोरे, भाजपाचे प्रदेश सचिव विनोद तावडे उपस्थित होते.

पंचायत राज खात्याच्या माध्यमातून देशातील दोन लाख ७९ हजार ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी जाहीर केलेल्या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घराला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. या योजनेतून गावाचा विकास आराखडा करून त्याची टप्प्या-टप्प्यात अंमलबजावणी केली जाईल. पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तीन स्तरावर विभाजन करून ग्रामीण भागात आदर्श ग्राम योजना राबविली जाईल. त्यातून गावाच्या विकासाचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी मंत्री पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ग्राम विकास हा पायलट प्रोजेक्ट काही राज्यात राबविण्यात येईल. ई- ग्रामपंचायत योजनेची अंमलबजावणी करून गावांना आधुनिक विकासाची जोड, स्वयंपूर्ण गावासाठी आधुनिक ग्रामविकासाचा रोड मॅप केला जाणार आहे, असे पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांनी सूत्रे स्विकारल्यानंतर नमूद केले.

 

स्वतंत्र भारताच्या ७४ वर्षांनंतर ठाणे जिल्ह्याला प्रथम मंत्रीपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला आहे. पंतप्रधानांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून उल्लेखनीय काम करणार आहे, असे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलCentral Governmentकेंद्र सरकारbhiwandiभिवंडी