शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

“उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले, योगींनी UP ला आघाडीचे राज्य बनवले”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 10:15 PM

योगी सरकारच्या कारभारामुळे उत्तर प्रदेश देशात आघाडीचे राज्य बनले आहे, असे कौतुकोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काढले आहे.

लखनऊ: गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे उत्तर प्रदेश देशपातळीवर चर्चेत आहे. एक म्हणजे वाराणसी दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियंत्रणावरून योगी सरकारचे कौतुक केले आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, काँग्रेसने निशाणाही साधला. यानंतर, उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले असून, योगी सरकारच्या कारभारामुळे उत्तर प्रदेश देशात आघाडीचे राज्य बनले आहे, असे कौतुकोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काढले आहे. (jp nadda appreciates yogi adityanath and uttar pradesh govt) 

भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजपचे आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना जेपी नड्डा यांनी योगी सरकारचे प्रशंसा केले. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही नड्डा यांनी केले. 

“PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले

उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले असून, योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभारामुळे राज्य आघाडीवर पोहोचले आहे. देशातील तुष्टीकरण संपुष्टात आले आहे. तसेच यापूर्वीच्या सरकारमध्ये घराणेशाही वाढली होती. मात्र, योगी सरकारच्या कालावधीत घराणेशाही संपून राज्य प्रगतीपथावर पोहोचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याचे प्राक्तन आणि चित्र बदलवले, असे सांगत पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे विरोधकांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. जनतेने विरोधकांना नाकारले आहे. आता त्यांची घरी बसायची वेळ आली आहे, असा टोला नड्डा यांनी लगावला आहे. 

जगण्याचा अधिकार सर्वांत महत्त्वाचा; कावड यात्रेवरुन सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले

उत्तर प्रदेशात मोठी क्षमता

उत्तर प्रदेशमध्ये मोठी क्षमता आहे. त्यामुळे प्रत्येक बुध सशक्त आणि मजबूत करण्यावर लोकप्रतिनिधींनी भर द्यायला हवा. तसेच भाजपची संघटना पुढे नेण्यासाठी योगदान द्यायला हवे, असे सांगताना उत्तर प्रदेश सरकार विकसित राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच डिसेंबर महिन्यापर्यंत १३३ कोटी देशवासीयांना लस देण्यात येईल, असे सांगितले जाते.

कोरोना नियंत्रणात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय; PM मोदींनी केली योगींची स्तुती

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना योगी सरकारचे क्रौर्य, दुर्लक्ष आणि अव्यवस्था ही लपून राहत नाही. नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. मोदी आणि योगी हे सत्य विसरले असले, तरी ज्यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे, ते कधीच विसरू शकणार नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपा