शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

"नरेंद्र मोदी PM आहेत पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 10:42 IST

Nitish Kumar And Narendra Modi : उपेंद्र कुशवाहा यांनी एक विधान केलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान पदाचे मटेरियल आहेत असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - बिहारमधील संयुक्त जनता दलाच्या (JDU) संसदीय पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा (Upendra Kushwaha) यांनी एक विधान केलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) पंतप्रधान पदाचे मटेरियल आहेत असं म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता त्यांच्यात आहेत. पण आपण आता एनडीएत आहोत आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीच (Narendra Modi) आहेत. ते चांगलं कामही करत आहेत असं उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. पण त्यांच्याशिवाय अनेक जणांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. त्यात नितीश कुमारही आहेत. यात कुठलेही दुमत नाही. त्यांना पीएम मटेरियल म्हटले गेले पाहिजे, असं देखील कुशवाहा यांनी सांगितलं. 

जातीनिहाय जणगणना झालीच पाहिजे. आता केली गेली नाही, तर आणखी काही वर्षांचा विलंब होईल. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना केली पाहिजे. असं न झाल्यास मोठं नुकसान होईल असं कुशवाहा म्हणाले. जनगणना मुद्यावर विरोधकांनी पाठिंबा दिल्यास त्यांचं स्वागतच आहे. राष्ट्रीय जनता दलासह इतर पक्षांनी समर्थन दिलं तर त्याला हरकत घेण्याचं काही कारण नाही. वातावरण निर्मिती करून हा मुद्दा बनवला पाहिजे. सामान्य जनगणनेसोबतच सरकारने जातीनिहाय जनगणनाही करावी. हे खूप गरजेचं आहे, अशी मागणी उपेंद्र कुशवाहा यांनी केली. जातीनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेससह, राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात येत आहे. 

सात महिन्यांतच नितीशकुमारांनी आपला वारसदार बदलला; खासदार ललन सिंह जदयूचे नवे अध्यक्ष

बिहार निव़डणूक संपताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकीय वारसदाराची घोषणा केली होती. तसे करणे त्यांना भागही होते. परंतू सात महिन्यांतच नितीश कुमारांनी पुन्हा दुसऱ्या वारदाराची निवड केली आहे. आज झालेल्या जेडीयूच्या कार्यकारिणीच्या बैठकीत खासदार ललन सिंह यांना नवा राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्यात आले आहे. ललन सिंह हे नितीश कुमार यांचे विश्वासू साथीदार आहेत. ते आरसीपी सिंह यांची जागा घेणार आहे. नितीश कुमार यांनी डिसेंबर 2020 च्या अखेरीस आरसीपी सिंह यांना पक्षाचा अध्यक्ष केले होते. नितीश कुमार नेहमीच अचानक आणि धक्कादायक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. 

गेल्या निवडणुकीत राजदसोबत निवडणूक लढवत लालूपुत्रांला उपमुख्यमंत्री केले होते. मात्र, ते डोईजड होऊ लागताच अचानक भाजपाची साथ पकडत पुन्हा सत्ता स्थापन केली होती. यावेळी देखील त्यांनी भाजपासोबतच निवडणूक लढविली होती. मात्र, ही निवडणूक त्यांच्यासाठी खूप कठीण गेली. हरण्याची चिन्हे दिसू लागताच नितीश कुमारांनी थेट निवृत्तीचेच का़र्ड खेळले. आता त्यांच्यासमोर उत्तराधिकारी शोधण्याचे आव्हान होते. कारण सातव्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नितीश कुमारांना विरोधकांसह भाजप, स्वपक्षियांकडूनही विचारणा होणार होती. म्हणून त्यांनी आरसीपी सिंह यांची निवड केली होती. परंतू पुन्हा अध्यक्ष बदलण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणprime ministerपंतप्रधानIndiaभारत