शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

'शरद पवारांमुळे राजकारणाचा विचका', राज ठाकरेंचं म्हणणं मान्य आहे का? नितीन गडकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:55 IST

Nitin Gadkari Raj Thackeray Sharad Pawar: महाराष्ट्रातील राजकारणाचा विचका झाला, त्याला शरद पवार कारणीभूत असल्याचे विधान राज ठाकरेंनी केले. याबद्दल नितीन गडकरींनी त्यांची भूमिका मांडली. 

Nitin Gadkari on Sharad pawar: महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला आहे. या सगळ्याला शरद पवार जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने करत आहेत. याबद्दल एका मुलाखतीत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एका नेत्यामुळे विचका झाला, असं म्हणणं अन्यायकारक आहे, अशी भूमिका नितीन गडकरींनी मांडली. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीला नितीन गडकरींनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं, भूमिका मांडली. 'महाराष्ट्रात राजकारणाचा विचका झालाय आणि याला कारणीभूत शरद पवार आहेत, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आपल्याला हे मान्य आहे का?' असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला होता. 

राज ठाकरेंच्या विधानावर नितीन गडकरींनी काय मांडली भूमिका?

या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले, "असं आहे की, राजकारणाचा विचका झालाय, हे मला मान्य आहे. पण, मी जसं सांगितलं की, कुण्या नेत्यामुळे विचका झाला हे म्हणणं अन्यायकारक आहे. कारण शेवटी कोणी काही सांगत असलं, तरी न्यायाधीश कोण आहे? मालक कोण आहे? जनता आहे."

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, "जनतेची जर दिशाभूल होत असेल, ती जर चुकीच्या मार्गावर जात असेल, तर समाजाला बदलवण्याची जबाबदारी आमची आहे."

लोकांना म्हणालो, "मी कमी पडलो"

याच मुद्द्यावर बोलताना नितीन गडकरींनी लोकसभा निवडणुकीचेही उदाहरण दिले. "मी नागपूरच्या सभेत बोललो. उत्तर नागपूरमध्ये मी ३२ हजारांनी मागे आहे. सगळ्या मतदारसंघात भरपूर मताधिक्य आहे, उत्तर नागपूरमध्ये मागे आहे. दलित बहुसंख्य मतदार आहेत तिकडे. मी त्यांना म्हटलं की, मी मागे आहे. पण, मी मागे आहे, याचा अर्थ माझं काम कमी पडलं. माझी सेवा कमी पडली. तुमचा विश्वास संपादन करण्यात मी कमी पडलो. मी स्वतःला दुरुस्त करेन आणि अजून जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन", असे मत गडकरींनी मांडले.

मी ज्या माणसाचा हात पकडतो, तो खड्ड्यात गेला तरी सोडत नाही -नितीन गडकरी  

"नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाहीये. हे शेवटी समाजामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून आणि राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. आणि राजकारण बदललं की, मी मित्र बदलत नाही. मी ज्या माणसाचा हात पकडतो, तो खड्ड्यात गेला तरी सोडत नाही. मी नेहमी राजकारणात मैत्री वेगळी ठेवली आणि राजकारण वेगळं ठेवलं", असे उत्तर नितीन गडकरींनी या प्रश्नाला दिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवार