शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'शरद पवारांमुळे राजकारणाचा विचका', राज ठाकरेंचं म्हणणं मान्य आहे का? नितीन गडकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:55 IST

Nitin Gadkari Raj Thackeray Sharad Pawar: महाराष्ट्रातील राजकारणाचा विचका झाला, त्याला शरद पवार कारणीभूत असल्याचे विधान राज ठाकरेंनी केले. याबद्दल नितीन गडकरींनी त्यांची भूमिका मांडली. 

Nitin Gadkari on Sharad pawar: महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला आहे. या सगळ्याला शरद पवार जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने करत आहेत. याबद्दल एका मुलाखतीत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एका नेत्यामुळे विचका झाला, असं म्हणणं अन्यायकारक आहे, अशी भूमिका नितीन गडकरींनी मांडली. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीला नितीन गडकरींनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं, भूमिका मांडली. 'महाराष्ट्रात राजकारणाचा विचका झालाय आणि याला कारणीभूत शरद पवार आहेत, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आपल्याला हे मान्य आहे का?' असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला होता. 

राज ठाकरेंच्या विधानावर नितीन गडकरींनी काय मांडली भूमिका?

या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले, "असं आहे की, राजकारणाचा विचका झालाय, हे मला मान्य आहे. पण, मी जसं सांगितलं की, कुण्या नेत्यामुळे विचका झाला हे म्हणणं अन्यायकारक आहे. कारण शेवटी कोणी काही सांगत असलं, तरी न्यायाधीश कोण आहे? मालक कोण आहे? जनता आहे."

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, "जनतेची जर दिशाभूल होत असेल, ती जर चुकीच्या मार्गावर जात असेल, तर समाजाला बदलवण्याची जबाबदारी आमची आहे."

लोकांना म्हणालो, "मी कमी पडलो"

याच मुद्द्यावर बोलताना नितीन गडकरींनी लोकसभा निवडणुकीचेही उदाहरण दिले. "मी नागपूरच्या सभेत बोललो. उत्तर नागपूरमध्ये मी ३२ हजारांनी मागे आहे. सगळ्या मतदारसंघात भरपूर मताधिक्य आहे, उत्तर नागपूरमध्ये मागे आहे. दलित बहुसंख्य मतदार आहेत तिकडे. मी त्यांना म्हटलं की, मी मागे आहे. पण, मी मागे आहे, याचा अर्थ माझं काम कमी पडलं. माझी सेवा कमी पडली. तुमचा विश्वास संपादन करण्यात मी कमी पडलो. मी स्वतःला दुरुस्त करेन आणि अजून जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन", असे मत गडकरींनी मांडले.

मी ज्या माणसाचा हात पकडतो, तो खड्ड्यात गेला तरी सोडत नाही -नितीन गडकरी  

"नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाहीये. हे शेवटी समाजामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून आणि राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. आणि राजकारण बदललं की, मी मित्र बदलत नाही. मी ज्या माणसाचा हात पकडतो, तो खड्ड्यात गेला तरी सोडत नाही. मी नेहमी राजकारणात मैत्री वेगळी ठेवली आणि राजकारण वेगळं ठेवलं", असे उत्तर नितीन गडकरींनी या प्रश्नाला दिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवार