शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

'शरद पवारांमुळे राजकारणाचा विचका', राज ठाकरेंचं म्हणणं मान्य आहे का? नितीन गडकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:55 IST

Nitin Gadkari Raj Thackeray Sharad Pawar: महाराष्ट्रातील राजकारणाचा विचका झाला, त्याला शरद पवार कारणीभूत असल्याचे विधान राज ठाकरेंनी केले. याबद्दल नितीन गडकरींनी त्यांची भूमिका मांडली. 

Nitin Gadkari on Sharad pawar: महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला आहे. या सगळ्याला शरद पवार जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने करत आहेत. याबद्दल एका मुलाखतीत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एका नेत्यामुळे विचका झाला, असं म्हणणं अन्यायकारक आहे, अशी भूमिका नितीन गडकरींनी मांडली. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीला नितीन गडकरींनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं, भूमिका मांडली. 'महाराष्ट्रात राजकारणाचा विचका झालाय आणि याला कारणीभूत शरद पवार आहेत, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आपल्याला हे मान्य आहे का?' असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला होता. 

राज ठाकरेंच्या विधानावर नितीन गडकरींनी काय मांडली भूमिका?

या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले, "असं आहे की, राजकारणाचा विचका झालाय, हे मला मान्य आहे. पण, मी जसं सांगितलं की, कुण्या नेत्यामुळे विचका झाला हे म्हणणं अन्यायकारक आहे. कारण शेवटी कोणी काही सांगत असलं, तरी न्यायाधीश कोण आहे? मालक कोण आहे? जनता आहे."

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, "जनतेची जर दिशाभूल होत असेल, ती जर चुकीच्या मार्गावर जात असेल, तर समाजाला बदलवण्याची जबाबदारी आमची आहे."

लोकांना म्हणालो, "मी कमी पडलो"

याच मुद्द्यावर बोलताना नितीन गडकरींनी लोकसभा निवडणुकीचेही उदाहरण दिले. "मी नागपूरच्या सभेत बोललो. उत्तर नागपूरमध्ये मी ३२ हजारांनी मागे आहे. सगळ्या मतदारसंघात भरपूर मताधिक्य आहे, उत्तर नागपूरमध्ये मागे आहे. दलित बहुसंख्य मतदार आहेत तिकडे. मी त्यांना म्हटलं की, मी मागे आहे. पण, मी मागे आहे, याचा अर्थ माझं काम कमी पडलं. माझी सेवा कमी पडली. तुमचा विश्वास संपादन करण्यात मी कमी पडलो. मी स्वतःला दुरुस्त करेन आणि अजून जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन", असे मत गडकरींनी मांडले.

मी ज्या माणसाचा हात पकडतो, तो खड्ड्यात गेला तरी सोडत नाही -नितीन गडकरी  

"नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाहीये. हे शेवटी समाजामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून आणि राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. आणि राजकारण बदललं की, मी मित्र बदलत नाही. मी ज्या माणसाचा हात पकडतो, तो खड्ड्यात गेला तरी सोडत नाही. मी नेहमी राजकारणात मैत्री वेगळी ठेवली आणि राजकारण वेगळं ठेवलं", असे उत्तर नितीन गडकरींनी या प्रश्नाला दिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवार