शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“एक आहे पण "नेक" आहे; राजू पाटलांच्या नेतृत्वात कल्याण-डोंबिवलीत मनसे यश मिळणार हे नक्की”

By प्रविण मरगळे | Updated: February 3, 2021 09:57 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना मनसेला याचा फटका बसू शकतो

ठळक मुद्देकोणीही गेला तरी आपला महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांवर श्रद्धा ठेवून कायमच कार्यरत असतोराजेश कदम यांनी अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर मंदार हळबेंनी भाजपाची वाट धरली.आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वात मनसेने महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याचा चंग बांधला आहे

मुंबई – कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांपूर्वी स्थानिक राजकारणाला वेग आला आहे. मनसेचे डोंबिवलीतील दोन मोठे नेते पक्ष सोडून गेल्याने मनसेला जबर धक्का बसला आहे. मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम आणि गटनेते मंदार हळबे यांच्या जाण्याने निवडणुकीपर्वीच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजेश कदम यांनी अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर मंदार हळबेंनी भाजपाची वाट धरली.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना मनसेला याचा फटका बसू शकतो, याच पार्श्वभूमीवर मनसेच्या प्रमुख नेत्यांची अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक घेतली, त्यानंतर २४ तासांत डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करत राज ठाकरेंनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. कल्याण-डोंबिवली मनसेसाठी पोषक वातावरण असलेला भाग आहे. याठिकाणी मनसेचा एकमेव आमदार राजू पाटील ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले.

कल्याण-डोंबिवली निवडणुकीत २०१३ मध्ये मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते, तर २०१७ मध्ये या निवडणुकीत मनसेचे १० नगरसेवक निवडून आले. मागील विधानसभा निवडणुकीत मनसेला याठिकाणी चांगले मतदान झाले, कल्याण ग्रामीण मतदारसंघाची जागा मनसेने खेचून आणली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसेने कंबर कसली आहे. आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वात मनसेने महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याचा चंग बांधला आहे. तत्पूर्वी शिवसेना-भाजपाने मनसेचे २ मोहरे हिरावून त्यांना चांगलाच धक्का दिला आहे.

यातच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे, नांदगावकर म्हणाले की, कालपासून डोंबिवलीतील काही जणांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला व त्याला विविध माध्यमांद्वारे वारंवार दाखविल्यामुळे त्याची बातमी झाली. कोणत्याही संघटनेतून कोणीही गेले तरी संघटना ही कायम कार्यरतच असते. आपल्या पक्षाने या आधीही अनेक मोठे पक्षांतर अनुभवले आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की कोणीही गेला तरी आपला महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांवर श्रद्धा ठेवून कायमच कार्यरत असतो असं त्यांनी सांगितले.

तसेच स्थानिक आमदार राजू पाटील व त्यांचे सहकारी हे सुद्धा कल्याण डोंबिवली मध्ये पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करत असतांना काही जण पक्ष सोडून गेले. परंतु यात निराश होण्याचे काही कारण नाही, तसेच जनता सगळे जाणून आहे व आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे या गोष्टींना अवास्तव महत्त्व न देता येणाऱ्या निवडणुकीची कसून तयार करावी. राजू पाटील हे आपले एकमेव आमदार आहेत, लोक अनेकदा म्हणतात की एकच आहे एकच आहे, पण आमचा एक आहे पण "नेक" आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील सर्वांना एकच विनंती की, अशा पक्षांतराने अजिबात विचलित होण्याचे कारण नाही. राजू पाटील यांच्या नेतृत्वात आपण कल्याण डोंबिवलीत मोठे यश मिळविणार हे नक्की असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :MNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक