शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक, चीनसमोर झुकले; भारताच्या पवित्र जमिनीचा काही भाग ड्रॅगनच्या ताब्यात”

By प्रविण मरगळे | Updated: February 12, 2021 10:36 IST

Congress Rahul Gandhi Target Defence Minister & PM Narendra Modi over India China Disputes: भारताच्या पंतप्रधानांनी देशाच्या पवित्र जमिनीचा तुकडा चीनला सोपवला आहे. चीनसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुडघे टेकले आहेत

ठळक मुद्देचीन मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची पवित्र जमीन चीनच्या ताब्यात दिली - राहुल गांधीपंतप्रधान मोदींनी देशाचा आणि सैन्याचा विश्वासघात केलाय

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भारतचीन सीमावादावरून केंद्र सरकारला टार्गेट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत, त्यांनी देशाची पवित्र जमीन चीनला सोपवली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे भारत चीन मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गुरुवारी संरक्षणमंत्र्यांनी त्यांचे म्हणणं संसदेत मांडले, यातील काही गोष्टी साफ झाल्या पाहिजेत, एप्रिलपूर्वी परिस्थिती सर्वसामान्य होईल असं सांगितलं जात होतं, परंतु आता संरक्षण मंत्र्यानी विधान केले आहे. भारताची जमीन फिंगर ४ पर्यंत होती, पण सरकारने आता फिंगर ३ वर सहमती का दिली? पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी भारताची जमीन चीनला का दिली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.(The Prime Minister is a Coward Says Rahul Gandhi) 

त्याचसोबत राहुल गांधींनी देपसांग प्रकरणावरही भाष्य करत त्याठिकाणाहून चीन सैन्य मागे का हटलं नाही? त्यावरून हे स्पष्ट होतं की, भारताच्या पंतप्रधानांनी देशाच्या पवित्र जमिनीचा तुकडा चीनला सोपवला आहे. चीनसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुडघे टेकले आहेत. चीनचे सैन्य पँगोंग, देपसांग याठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या सैन्यांनी जाखमी घेतली आणि चीनशी मुकाबला केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला आपली जमीन दिली. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत आणि देशाच्या सैन्याचा विश्वासघात करत आहेत असं दिसून येते असा घणाघात राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केला.(India China Faceoff) 

त्याचसोबत चीन मुद्द्यावर फक्त संरक्षण मंत्री का बोलत आहेत? स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासमोर सत्य सांगावे, भारताची जमीन फिंगर ४ पर्यंत होती, पण आता फिंगर ३ ते ४ जमीन चीनच्या ताब्यात गेली. भारताची पवित्र जमीन चीनने घेतली हे सत्य आहे. मोदींनी याचं उत्तर द्यावं, चीन आपल्या हद्दीत येऊन बसला आणि केंद्र सरकार त्याला काहीच बोलत नाही. नरेंद्र मोदी चीनविरोधात उभे राहू शकत नाहीत. भारताने कधीच हे सहन करू नये असं राहुल गांधी म्हणाले आहेत.  

टॅग्स :IndiaभारतchinaचीनRajnath Singhराजनाथ सिंहindia china faceoffभारत-चीन तणावRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी