शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक, चीनसमोर झुकले; भारताच्या पवित्र जमिनीचा काही भाग ड्रॅगनच्या ताब्यात”

By प्रविण मरगळे | Updated: February 12, 2021 10:36 IST

Congress Rahul Gandhi Target Defence Minister & PM Narendra Modi over India China Disputes: भारताच्या पंतप्रधानांनी देशाच्या पवित्र जमिनीचा तुकडा चीनला सोपवला आहे. चीनसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुडघे टेकले आहेत

ठळक मुद्देचीन मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची पवित्र जमीन चीनच्या ताब्यात दिली - राहुल गांधीपंतप्रधान मोदींनी देशाचा आणि सैन्याचा विश्वासघात केलाय

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भारतचीन सीमावादावरून केंद्र सरकारला टार्गेट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत, त्यांनी देशाची पवित्र जमीन चीनला सोपवली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे भारत चीन मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गुरुवारी संरक्षणमंत्र्यांनी त्यांचे म्हणणं संसदेत मांडले, यातील काही गोष्टी साफ झाल्या पाहिजेत, एप्रिलपूर्वी परिस्थिती सर्वसामान्य होईल असं सांगितलं जात होतं, परंतु आता संरक्षण मंत्र्यानी विधान केले आहे. भारताची जमीन फिंगर ४ पर्यंत होती, पण सरकारने आता फिंगर ३ वर सहमती का दिली? पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी भारताची जमीन चीनला का दिली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.(The Prime Minister is a Coward Says Rahul Gandhi) 

त्याचसोबत राहुल गांधींनी देपसांग प्रकरणावरही भाष्य करत त्याठिकाणाहून चीन सैन्य मागे का हटलं नाही? त्यावरून हे स्पष्ट होतं की, भारताच्या पंतप्रधानांनी देशाच्या पवित्र जमिनीचा तुकडा चीनला सोपवला आहे. चीनसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुडघे टेकले आहेत. चीनचे सैन्य पँगोंग, देपसांग याठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या सैन्यांनी जाखमी घेतली आणि चीनशी मुकाबला केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला आपली जमीन दिली. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत आणि देशाच्या सैन्याचा विश्वासघात करत आहेत असं दिसून येते असा घणाघात राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केला.(India China Faceoff) 

त्याचसोबत चीन मुद्द्यावर फक्त संरक्षण मंत्री का बोलत आहेत? स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासमोर सत्य सांगावे, भारताची जमीन फिंगर ४ पर्यंत होती, पण आता फिंगर ३ ते ४ जमीन चीनच्या ताब्यात गेली. भारताची पवित्र जमीन चीनने घेतली हे सत्य आहे. मोदींनी याचं उत्तर द्यावं, चीन आपल्या हद्दीत येऊन बसला आणि केंद्र सरकार त्याला काहीच बोलत नाही. नरेंद्र मोदी चीनविरोधात उभे राहू शकत नाहीत. भारताने कधीच हे सहन करू नये असं राहुल गांधी म्हणाले आहेत.  

टॅग्स :IndiaभारतchinaचीनRajnath Singhराजनाथ सिंहindia china faceoffभारत-चीन तणावRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी