शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर भाजपाला महाराष्ट्रात राजकारण करणे महागात पडेल!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 16:27 IST

Sachin Sawant : मुंबईची जनता भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असेही सावंत सावंत म्हणाले.

ठळक मुद्दे'मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित करण्याचा भाजपाचा कुटील डाव उघड झाला आहे.'

मुंबई : मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करावा अशी सीमा भागातील जनतेची मागणी असून तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित घोषित करावे, या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या विधानाचा काँग्रेसने तीव्र निषेध केला असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित करण्याचा भाजपाचा कुटील डाव उघड झाला आहे. परंतु भाजपाने मुंबईकडे वाकड्या नजरेने जरी पाहिले तर महाराष्ट्रात राजकारण करणे त्यांना महागात पडेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे.

लक्ष्मण सवदी यांच्या विधानातून केंद्रातील मोदी सरकाराचा कुटील डाव स्पष्ट झालेला आहे. मुंबईला कमकुवत करण्याचा, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे भाजपाचे षडयंत्र राहिले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये हलवण्याचा, मुंबईतील उद्योगधंदे व प्रकल्प गुजरात व इतरत्र हलवण्याचे काम मागील सहा वर्षापासून बिनदिक्कतपणे सुरु असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र गप्प बसून होते. मुंबईला केंद्रशासित करण्याचा हा डाव होता, असे सचिन सावंत म्हणाले.

याचबरोबर, कधी सीबीआय, एनसीबी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांकडून येथील उद्योग- व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भिती निर्माण केली जात आहे, बॉलिवूडचाही छळ मांडला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलवण्यासाठी केलेले प्रयत्न हे असेच सुरु झालेले नाहीत. या घटनातून भाजपाचा कुहेतू पद्धतशिरपणे सुरु होता हे स्पष्ट दिसते. मोदी व भाजपाला महाराष्ट्राबद्दल इतका आकस का आहे, हा प्रश्न विचारून १०५ हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. तसेच मुंबईची जनता भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असेही सावंत सावंत म्हणाले.

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतMumbaiमुंबईBJPभाजपाcongressकाँग्रेस