शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'काँग्रेसनं लोकसभा निवडणूक जिंकल्यास पाकिस्तानात दिवाळी साजरी होईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 13:29 IST

काँग्रेस जिंकल्यास पाकिस्तानमध्ये आनंद साजरा होईल; भाजपा मुख्यमंत्र्याचं अजब विधान

अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीत चुकून काँग्रेसला यश मिळाल्यास पाकिस्तानात दिवाळी साजरी होईल, असं विधान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केलं आहे. 'येत्या निवडणुकीत असं काही घडणार नाही. पण 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि त्यात चुकून काँग्रेसचा विजय झाला, तर पाकिस्तानात आनंद साजरा होईल. कारण ते (काँग्रेस) त्यांच्याशी संबंधित आहेत,' असं रुपानी यांनी मेहसाण्यात भाजपाच्या विजय संकल्प रॅलीला सुरुवात करताना म्हटलं. देशातील जनता मोदींच्या पाठीमागे उभी राहील आणि 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात त्यांनाच विजयी करेल, असा विश्वास गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागणारे काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांच्यावर शरसंधान साधलं. 'पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो, ही बाब संपूर्ण जगाला माहीत आहे. मात्र पाच-सात जणांच्या कृत्यासाठी पाकिस्तानला दोषी धरणं चुकीचं असल्याचं राहुल गांधींचे शिक्षक असलेल्या पित्रोडांना वाटतं. काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत,' अशी टीका रुपानी यांनी केली. विरोधक सुरक्षा दलांचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुरक्षा दलांच्या प्रमुखांची विधानं खोटी ठरवून तुम्ही नेमकं कोणाचं समर्थन करत आहात?, असा प्रश्न रुपानी यांनी विचारला. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची सुटका एनडीए सरकारनंच केली होती, या राहुल गांधींच्या विधानावरदेखील त्यांनी भाष्य केलं. काँग्रेसनं त्यांच्या सत्ताकाळात अनेक दहशतवाद्यांची सुटका केल्याचं ते म्हणाले. काँग्रेसनं मतपेढीचं राजकरण करत फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांनी केला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदVijay Rupaniविजय रूपाणीGujaratगुजरात