शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

...तर सीबीआय चौकशी करावी; सुशांत प्रकरणात काँग्रेसच्या मंत्र्याची शिवसेनेविरोधात भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 19:24 IST

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातही सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी चाहत्यांकडून लावून धरण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यावरुन सरकारमध्ये मतभेद केंद्राला वाटत असेल सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशी करु शकतं. काँग्रेस मंंत्री अस्लम शेख यांचं विधान

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात केंद्राला सीबीआय चौकशी करायची असेल तर करावी असं वक्तव्य राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याने केले आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीवरुन राज्य सरकारच्या महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी सीबीआय चौकशीला पाठिंबा दिल्याचं त्यांच्या विधानावरुन दिसत आहे.

या प्रकरणी मंत्री अस्लम शेख म्हणाले की, सुशांत प्रकरण मुंबई पोलीस चांगल्यारितीने तपास करत आहे. पण केंद्राला वाटत असेल यामध्ये आणखी तपासाची गरज आहे तर त्यांनी चौकशी करावी. ही घटना मुंबईत घडली आहे. काही लोकांनी या प्रकरणात मीडियात नावं यावी यासाठी विधाने करत आहे. लॉकडाऊनमुळे शुटींग बंद आहे त्यामुळे या वादात काहीतरी बोलून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई पोलिसांनी तपास केला आहे तरी केंद्राला वाटत असेल सीबीआय चौकशी करावी तर करु शकतात असं ते म्हणाले.

तसेच तपासाला ६० दिवस असो, १२० दिवस झाले, केंद्र सरकारला वाटत असेल तर त्यांनी चौकशी करावी असं मत अस्लम शेख यांनी मांडले आहे. सुप्रीम कोर्टात याबाबतचं प्रकरण असताना राज्य सरकार सीबीआयकडे हे प्रकरण सोपवू नये यासाठी विरोध करत आहे. अशा परिस्थितीत जर काँग्रेसमधील मंत्री सीबीआय चौकशीच्या मागणीला पाठिंबा देत असतील तर नक्कीच हे महत्त्वपूर्ण विधान आहे. (Sushant Singh Rajput Death)

शिवसेनेची भूमिका काय?

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना सल्ला दिला होता. या प्रकरणावरून शिवसेना कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही असं बोलून राऊतांनी खडसावलं होतं. सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य दिशेने करत आहेत. पुढील तपासासाठी सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांच्या तपासाला सहकार्य करावं असं राऊत म्हणाले होते.

दरम्यान, सुशांतच्या कुटुबीयांसंदर्भात संजय राऊतांनी विधान केले होते. सुशांतच्या वडिलांचे दुसरे लग्न झाल्याचे सांगत सुशांत व त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते, असा दावाही राऊत यांनी केला होता. त्यानंतर, संजय राऊत यांच्या विधानावरुन सुशांतच्या कुटुंबीयांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली. तसेच, माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा असं आवाहनही केलं होतं. (Sushant Singh Rajput Death)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातही सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी चाहत्यांकडून लावून धरण्यात आली आहे. अनेक कलाकारांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. तर सीबीआय चौकशीच्या मागणीवरुनच पवार कुटुंबामधील मतभेद समोर आले होते. शरद पवारांनी मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे असं सांगत पार्थ पवाराच्या मागणीला फटकारलं होतं. मात्र त्यांनी हे विधानही केले होते की, ज्यांना सीबीआय चौकशी मागणी करायची आहे, करु शकतात त्याला आमचा विरोध नाही असंही मत पवारांकडून व्यक्त केलं होतं. त्यामुळे सुशांत सिंग प्रकरण सीबीआयकडे देण्यावरुन राज्य सरकारमध्ये मतभेद आहेत का? असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस