शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

बिहारमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं

By बाळकृष्ण परब | Updated: October 17, 2020 21:36 IST

Bihar Assembly Election 2020 News : बिहारमध्ये सध्या भाजपा आणि जेडीयू यांची आघाडी असली आणि ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येत असली तरी निवडणुकीच्या निकालांनंतर नेमकी काय समिकरणे तयार होतील, याचा अंदाज घेतला जात आहे.

ठळक मुद्देबिहार निवडणुकीनंतरच्या परिस्थितीतीबाबत ज्या काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यावर मी पूर्णविराम लावू इच्छितोनितीश कुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील.नितीश कुमार हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे आघाडी मोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही

नवी दिल्ली - बिहार विधानसभेची निवडणूक कोण जिंकणार यापेक्षा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण बनणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बिहारमध्ये सध्या भाजपा आणि जेडीयू यांची आघाडी असली आणि ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येत असली तरी निवडणुकीच्या निकालांनंतर नेमकी काय समिकरणे तयार होतील, याचा अंदाज घेतला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री कोण होणार हे, स्पष्टच सांगून टाकले आहे.बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपा आणि जेडीयूमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अमित शाहा यांनी न्यूज १८ नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. अमित शाहा म्हणाले की, निवडणुकीनंतरच्या परिस्थितीतीबाबत ज्या काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यावर मी पूर्णविराम लावू इच्छितो. नितीश कुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. देशाबरोबरच बिहारमध्येसुद्धा मोदी लाट आहे. त्यामुळे आघाडीच्या सहकाऱ्यांना समानपणे मदत मिळेल. नितीश कुमार हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे आघाडी मोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही.अमित शाह यांनी पुढे सांगितले की, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या तरी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री बनतील. अमित शाहा यांच्या या विधानामुळे बिहारमध्ये निवडणुकीनंतर नवी समिकरणे उदयास येण्याच्या चर्चेस पूर्णविराम मिळणार आहे.दरम्यान, या मुलाखतीत तनिष्कच्या वादग्रस्त जाहीरातीबाबतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमक प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह म्हणाले की, भारतात सामाजिक समरसतेची पाळेमुळे भक्कम आहेत. त्यावर असे हल्ले करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. इंग्रजानींसुद्धा हा सद्भाव तोडण्याचा प्रयत्न केला. पुढे काँग्रेसनेसुद्धा तसाच प्रयत्न केला, असे अमित शाह म्हणाले. यावेळी अमित शाह यांनी ओव्हरअ‍ॅक्टिव्हिझमविरोधात इशारासुद्धा दिला. ते म्हणाले की, मला वाटते की, अतिसक्रियतेचे कुठलेही रूप असता कामा नये.बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकAmit Shahअमित शहाBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार