शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
3
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
4
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
5
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
6
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
7
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
8
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
9
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
10
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
11
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; महाविकास आघाडी नको, महापौरांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 17:58 IST

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी महापौरांवर केलेल्या टीकेनंतर म्हस्के यांच्यासह जेष्ठ नगरसेवक राम रेपाळे, विकास रेपाळे आणि योगेंद्र जानकर यांनीही लगोलग पत्रकार परिषद घेऊन परांजपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले

ठाणे : ठिणगी लावली तर आग भडकणारच. घरी बसलेल्या नेत्याला बोलण्याची संधी मिळावी, त्यासाठी हे सर्व सुरु आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश शिवसैनिक पाळतात. परंतू, आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक अशीच सुरु राहिली तर पालकमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल. पण वैयक्तिकरित्या अशी महाविकास आघाडी नको अशी उद्वीग्नता ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा महापौर नरेश म्हस्के यांनी रविवारी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी महापौरांवर केलेल्या टीकेनंतर म्हस्के यांच्यासह जेष्ठ नगरसेवक राम रेपाळे, विकास रेपाळे आणि योगेंद्र जानकर यांनीही लगोलग पत्रकार परिषद घेऊन परांजपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडी असल्यामुळे कोणतेही राजकीय भाषण किवा टीका टीप्पणी नको, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. त्यांचे आदेश शिवसैनिक पाळतात. परंतू, आव्हाड यांनी मात्र टीकाटीप्पणी केली. तो विषय संपला. दिशा बदलूनही आपली हालत काय झाली? हे ज्यांना समजले नाही, त्यांनी महापौरांना कळले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. कलियुगातील कलींना पुरुन उरण्यासाठी या नारदाची गरज असल्याचेही महापौर म्हणाले.

शिवसेनेत नसतो तर महापौर झालो नसतो. त्यामुळे पक्षासाठी काम करणे हे आपले कर्तव्य आहे. स्मार्ट सिटीमध्ये आपल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेतेही संचालक आहेत. ही कंपनी कायद्याप्रमाणे चालते. याच्या कामकाजाची माहिती करुन घ्यावी, मगच कमिशनचा आरोप करावा, असेही महापौर म्हणाले. तर शिवसैनिकांनी चपला झिजवल्यामुळेच दिवंगत प्रकाश परांजपे यांच्यानंतर आनंद हे खासदार झाले होते, अशी आठवण जानकर यांनी करुन दिली. आघाडीतील खऱ्या अर्थाने नारमुनी हे आनंद परांजपे असल्याचे विकास रेपाळे म्हणाले.

मुंब्रा येथील वाईट कामाचा दोष राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते शानू पठाण महापौरांना देतात. मग चांगल्या कामाचे श्रेय देखील द्यायला हरकत नाही. निधी पाहिजे असल्यास नारदमुनी चालतो का? असा सवालही महापौरांनी उपस्थित केला. मिशन कळवा जर राष्ट्रवादीला झोंबले असेल तर आघाडी होईल नाही होईल. यापुढे मिशन मुंब्रा, वागळेच नव्हे तर बालेकिल्ला असल्यामुळे शिवसेना मिशन ठाणे महापालिका राबविणार असल्याचा दावाही त्यांनी केला. चिखल उडवून घ्यायचा नसून आता आमच्यासाठी हा विषय संपल्याचेही त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस