शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेस नेत्यांचे पत्र बाहेर गेलेच कसे?; ज्येष्ठ नेत्यांनी केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 01:13 IST

‘त्या’ नेत्यांकडून पत्राबाबत खुलासा; वादळ शांत करण्यासाठी मनमोहनसिंग, अँटोनींचा पुढाकार

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बंडाचे रागरंग दाखवणारे नेते सोमवारी वाईटरीत्या फक्त वेगळेच पडले, असे नाही तर ते वारंवार आपल्या पत्राबद्दल स्पष्टीकरण करत होते.

कार्यकारिणी समितीच्या वरिष्ठ सदस्य अंबिका सोनी यांनी ज्या नेत्यांनी नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला त्या सगळ््यांवर कारवाईची मागणी केली. या नेत्यांनी फक्त सोनिया गांधी यांना पत्र लिहिलेच नाही तर प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचण्याचीही व्यवस्था केली, असे म्हणताना अंबिका सोनी यांना अश्रू आवरले नाहीत. त्या म्हणाल्या, ‘‘माझी प्रकृती बरी नसताना मी येथे बैठकीला आले व ही माझी शेवटची कार्यकारिणी समितीची बैठक आहे.’’

अंबिका सोनी यांनी केलेल्या या हल्ल्याने त्रासलेले मुकुल वासनिक, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा बचावात्मक पवित्र्यात आले व त्यांनी खुलासा केला की, ‘‘आम्ही सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्याविरोधात काहीही बोललेलो नाही की पत्र बाहेर जाऊ दिले.’’ पत्र लिहिणारे चौथे सदस्य जितीन प्रसाद यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांची क्षमा मागताना आपले वडील जितेंद्र प्रसाद यांचा हवाला दिला. ते म्हणाले की, ‘‘त्यांनी अनेक वर्षे गांधी कुटुंबाला साथ दिली मग मी कसा गांधी कुटुंबापासून वेगळा होऊ शकतो? माझा पूर्ण विश्वास सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर आहे आणि राहुल गांधी यांनी अध्यक्षपद घ्यावे, असे मला वाटते.’’

नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावरून जे वादळ पक्षात निर्माण झाले ते शांत करण्यात मनमोहन सिंग आणि ए. के. अँटोनी यांची महत्त्वाची भूमिका होती. बैठक सुरूहोताच २३ नेत्यांच्या पत्रावरून मनमोहन सिंग यांनी टिप्पणी की, ते पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत जाणे फारच दु:खद आहे. यामुळे काँग्रेसचे खूप नुकसान होईल. अंतरीम अध्यक्ष म्हणून न राहण्याची भूमिका न सोडणाऱ्या सोनिया गांधी यांची त्यांनी समजूत काढली. पक्ष जोपर्यंत नवा अध्यक्ष निवडत नाही तोपर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणून राहण्यास गांधींना त्यांनी तयार केले. अँटोनी यांचे म्हणणे होते की, ते एक क्रूर पत्र असून ते सहन केले जाऊ शकत नाही. कारण सार्वजनिक ठिकाणी असे मुद्दे घेऊन जाणे ही काँग्रेसची परंपरा नाही.

या दरम्यान पी. चिदंबरम यांनी युक्तिवाद केला की, ‘‘सोनिया गांधी यांना काँग्रेस अधिवेशन होईपर्यंत अध्यक्ष पदावर राहू देणे आपण सगळ््यांची जबाबदारी आहे. काही महिन्यांत कोरोनावरील लस येईल तेव्हा आम्ही महाअधिवेशन बोलावून नवा अध्यक्षाची निवड करू शकतो.’’ यावर राहुल गांधी म्हणाले की, ‘‘फेब्रुवारीपर्यंत कोणतीही लस येणार नाही. आम्हाला कोरोनाला तोंड द्यावे लागेल.’’ त्यावर चिदंबरम यांची सूचना होती की, पक्षाचे महाअधिवेशन व्हर्च्युअल बोलावले जावे. ही सूचना सोनिया गांधी यांनी फेटाळून लावताना म्हटले की, परंपरेनुसार महाअधिवेशन आयोजित केले जावे. राहुल यांची सूचना होती की, जोपर्यंत नवा अध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत सोनिया गांधी यांच्या मदतीसाठी दोन - चार लोकांना नियुक्त केले जावे.

अहमद पटेल बैठकीत सगळ््यात कमी बोलले. ते म्हणाले, ‘‘जे काही व्हायचे ते घराच्या चार भिंतीत. घराबाहेर होऊ नये. पत्राची प्रत बाहेर गेलीच कशी?’’ त्यावर गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘‘मी या पत्राची कोणतीही प्रतिलिपी बनवली नव्हती.’’ त्यावर रणदीप सुरजेवाला यांनी हल्ला केला की, ‘‘संजय झा यांचे भाष्य मग कसे आले?’’ या दरम्यान, के. सी. वेणुगोपाल उठून बाहेर जाताना पडद्यावरदिसले.काय म्हणाले राहुल गांधी?राहुल गांधी बैठकी दरम्यान बरेच उग्र आणि चिंतित दिसले. ते म्हणाले, ‘‘माझी आई रुग्णालयात होती आणि पक्षाचे नेते त्यांना प्रश्न विचारत आहेत. त्यांनी पक्षासाठी एवढी वर्षे जे काही केले त्यानंतरही त्यांच्याकडे बोट दाखवणे किती योग्य आहे?’’ राहुल यांचे थेट लक्ष्य होते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा.आझाद यांनी असा खुलासा केला की, ‘‘आमचा हेतू सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्या दिशेने बोट उचलण्याचा नव्हता. आमची तर इच्छा आहे की, राहुल गांधी यांनी नेतृत्वपद सांभाळावे आणि मोदी- शहा यांच्याविरोधात आघाडी उघडावी.’’ आझाद तर असेही म्हणाले की, ‘‘आमच्यावर आरोप करू नका. सोनिया गांधी आमच्या नेत्या आहेत व राहतीलही.’’ आनंद शर्मा यांनी आपल्या पत्राला योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला. परंतु चारही दिशांनी होत असलेला हल्ला पाहून त्यांनी तात्काळ भूमिका बदलली व म्हटले की, ‘‘राहुल गांधी हेच अध्यक्ष असावेत, असे आम्हाला वाटते.’’

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी