शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने स्वबळ एकवटावे कसे?

By किरण अग्रवाल | Updated: June 20, 2021 11:00 IST

Nana Patole : नाना पटोले केवळ स्वबळाची भाषा करून थांबलेले नाहीत तर त्यांनी प्रतिकूल स्थितीतही काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू करून दिले आहे.

ठळक मुद्देपटोले यांच्या विधानांनी इतरांची चुळबुळ मात्र सुरू

- किरण अग्रवाल

क्षमतांचा विचार न करता रान पेटवून देण्याला राजकारणात वेगळे महत्त्व असते, नाही काही तर त्यातून स्वकीयांना असो की इतरांना; काही संकेत नक्कीच देता येतात व जमलेच तर तकलादू खुंटे बळकट करून घेता येतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी पश्चिम वऱ्हाडचा दौरा करून जागोजागी स्वबळावर लढण्याच्या तयारीची जी भाषा केली त्याकडेही याच संदर्भाने बघता यावे.

 

नानाभाऊ पटोले तसे अघळपघळ स्वभावाचे, मनात येईल ते हातचे न राखता मोकळेपणे बोलून जाणारे; त्यामुळे अकोला - बुलडाणा जिल्ह्यातील दौऱ्यात पक्ष संघटनेच्या बांधणीबाबत मार्गदर्शन करताना आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छाही ते व्यक्त करून गेलेत. नानाभाऊंनी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागण्याच्या केलेल्या आवाहनापासून ते मुख्यमंत्री होण्याच्या त्यांच्या इच्छेपर्यंत, आता राज्यभर गहजब सुरू आहे. विरोधकांबरोबरच राज्याच्या महाआघाडीतील सहकाऱ्यांनीही नानाभाऊंना सल्ले देणे सुरू केले आहेे; पण नानाभाऊंनी एक पाऊल पुढे टाकत राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी राज्यात संकल्प दिन पाळला. आत्मविश्वास व त्याच्या जोडीला मेहनत करण्याची त्यांची तयारी यातून दिसून यावी.

 

नानाभाऊंच्या स्वबळाच्या भाषेवरून राज्यात काँग्रेसचे बळ किती, असा प्रश्न सर्वत्र केला जाणे स्वाभाविकही आहे; तसे पश्चिम वऱ्हाडातला विचार केला तर येथेही ते जेमतेमच आढळते. बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात एकेक आमदार वगळता काही नाही. म्हणायला बुलडाणा जिल्ह्यात संघटनात्मक स्थिती त्यातल्या त्यात बरी आहे; पण इतर ठिकाणी आंदोलन करायचे तर कार्यकर्त्यांची वानवा जाणवते ही वस्तुस्थिती आहे. बहुतेक ठिकाणी गटबाजीने काँग्रेसला पोखरून ठेवले आहे. यंदा राज्यातील सत्तेचा वनवास संपला; पण पश्चिम वऱ्हाडातील कोणाच्या नशिबी सत्तेचा काय वाटा आला याचे उत्तर समाधानकारक देता येत नाही. पक्ष वाढणार कसा, हा प्रश्न त्यातूनच उपस्थित होतो. स्वबळाची तयारी करायला अजिबात हरकत नाही, पण बळ एकवटायचे कशाच्या आधारावर?

 

काँग्रेसला स्वबळ आजमावायचे तर भाजपबरोबरच महाआघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीशी सामना करावा लागेल, त्यात वंचित बहुजन आघाडीचाही महत्त्वाचा फॅक्टर असेल. पश्चिम वऱ्हाडात भाजपकडे संजय धोत्रे यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिपदासह अकोला महापालिका व सर्वाधिक आमदारांचे बळ आहे. बहुतांश नगरपालिकाही ताब्यात आहेत. स्वकीयांच्याच दृष्टीने विचार करायचा तर राष्ट्रवादीने बुलडाणा जिल्ह्यातून राजेंद्र शिंगणे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादीचा आमदार नाही, मात्र तेथील पक्षसंघटन चांगले आहे. अकोल्यात अमोल मिटकरी यांना विधान परिषदेत संधी देऊन संघटना बांधणीचे संकेत दिले आहेत, शिवाय मातब्बर नेते राष्ट्रवादीकडे आहेत; या तुलनेत काँग्रेस मात्र विकलांग अवस्थेत दिसते. अशा स्थितीत राष्ट्रवादीशी लढायचे तर ते वाटते तितके सोपे नाही.

 

शिवसेनेकडेही वाशिम व बुलडाण्यातली खासदारकी आहे. बुलडाण्यातील दोघा आमदारांचा चांगला प्रभाव आहे, अकोल्यातील एका आमदारकीखेरीज विधान परिषदेतील गोपीकिशन बाजोरिया यांना आता प्रतोद म्हणून नेमण्यात आल्याने त्या बळाचा पक्ष संघटनेसाठी उपयोग होऊ शकेल. जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहेच, विविध पंचायत समित्यांमध्येही अस्तित्व राखून असताना एकूणच राजकारणात ते निर्णायक भूमिकेत आहेत. तेव्हा काँग्रेसचा एकेरी मार्ग निर्धोक नाहीच. कशाला, या पक्षाला तसेही विरोधकांची फारशी गरज नसते. स्वकीयच आडवे जाण्यात कसूर ठेवत नाहीत, त्यामुळे घरातले खुंटे बळकट होणेही गरजेचेच आहेत.

 

सारांशात, कोणालाही सहज घेता येऊ नये किंवा कोणाचीही उणीव भरून काढता येऊ नये अशा या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला स्वबळाची तयारी करायची म्हणजे खूपच यातायात करावी लागेल. भविष्यात ती घडून येईल न येईल; पण नानाभाऊंची इच्छा बघता कार्यकर्ते कामाला लागलेत तरी पुरे.

 

नाना पटोले केवळ स्वबळाची भाषा करून थांबलेले नाहीत तर त्यांनी प्रतिकूल स्थितीतही काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू करून दिले आहे. अमरावतीचे मातब्बर नेते डॉ. सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाकडे त्यासंदर्भात बघता येणारे असून, सहयोगी पक्षातही त्यामुळे चलबिचल होणे स्वाभाविक ठरावे. उक्तीला कृतीची जोड देताना पटोले यांनी लगेचच संकल्प दिनही साजरा करीत या संकल्पास सिद्धीकडे नेण्याचा प्रवास सुरू करून दिला आहे. राज्याच्या सत्तेत असूनही स्थानिक पातळीवर आलेली पक्षातील सुस्तावस्था यामुळे झटकली जाण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले