शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राहुल गांधी लेझर गनच्या निशाण्यावर होते?; गृह मंत्रालय म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 19:53 IST

राहुल गांधींना अधिक सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा आरोप गृह मंत्रालयानं फेटाळला. अमेठीत लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या राहुल गांधींच्या चेहऱ्यावर लेझर लाईट असलेला फोटो व्हायरल झाला. यानंतर राहुल गांधींच्या जीवाला धोका असून त्यांना कडेकोट सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. मात्र राहुल गांधींच्या चेहऱ्यावर पडलेला तो प्रकाश लेझर गनचा नसून त्यांच्या आसपास असलेल्या फोटोग्राफर्सच्या मोबाइल फोनचा असल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं. राहुल गांधी अमेठीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या चेहऱ्यावर काही वेळा हिरव्या रंगाचा लेझर लाइट दिसला. हा प्रकाश तिथे उपस्थित असलेल्या पत्रकाराच्या मोबाइलचा असल्याची माहिती गृह मंत्रालयानं दिली. विशेष सुरक्षा दलाकडून घेण्यात आलेल्या माहितीनंतर गृह मंत्रालयानं हे स्पष्ट केलं. राहुल गांधींच्या डोक्यावर दोन ते तीन वेळा हा प्रकाश दिसल्यानं काँग्रेसनं चिंता व्यक्त केली. त्यानंतर काँग्रेसनं गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं. त्यामधून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा संदर्भ देत राहुल यांना चोख सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली.बुधवारी राहुल गांधींनी अमेठीत उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाच्या महासचिव प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी राहुल गांधींनी अमेठीत मोठा रोड शो केला. यामध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttarakhand Lok Sabha Election 2019उत्तराखंड लोकसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसamethi-pcअमेठी